Friday, 27 December 2019

सलीलदा

बंगाली लोकांनी भारताच्या सांस्कृतिक जडणघडणे साठी मोलाचे काम केले आहे. साहित्य, कला, संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान वादातीत आहेमागे मी एक लेख ऋषिदा वर लिहला. हा लेख असाच एका भद्र व्यक्तीवर म्हणजे सलीलदा म्हणजेच सलील चौधरी वर. १९४३ च्या बंगालच्या भीषण दुष्काळा नंतर सुरु झालेल्या आम लोकांच्या चळवळीतून आलेले हे एक रत्न. वडील चहाच्या मळ्यात नोकरी करायचे. तिथेच लहान सलीलदांना पाश्चात्य संगीताची ओळख आणि आवड निर्माण झाली. Choir, symphony, Rock, Jazz अश्या पाश्चिमात्य संगीत प्रकारात निपूण असलेले सलीलदा, भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे गाढे अभ्यासक होते. ५० नंतरच्या दशकात भारतीय आणि पाश्चात्य संगीत ह्यांचा सुंदर मेळ घालून ज्याला Fusion म्हणतात हा संगीत प्रकार हिंदी चित्रपटात आणणारे अग्रेसर संगीतकार म्हणजे सलीलदा

प्रत्येक कला प्रकाराला एक व्यक्तिमत्व (body) असते. एखादी चित्र कोणी काढले असेल हे जाणकार लगेच ओळखतात त्या चित्राच्या व्यक्तिमत्वावरून. सचिन तेंडुलकरचा फटका त्याचा चेहरा दिसला नाही तरी आपण लगेच ओळखतो. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत हे गाणे कोणत्या संगीतकाराने केले हे जाणकार लगेच ओळखतात ते त्या गाण्याच्या व्यक्तिमत्वावरून. पण सलीलदा त्याला अपवाद होते. त्यांची एक ठरावीक style नव्हतीच. त्यामुळे जेव्हा कधी हे गाणे कोणाचे असेल हे कळत नाही, गाणे खूप चांगले आहे, चांगले fusion पण आहे तर माझा पहिला कयास सलीलदा असतात. सलीलदा पाश्चात्य, भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे जाणकार होते त्यामुळे त्यांनी ह्या सर्व प्रकाराचा भरपूर वापर त्यांच्या संगीतात केला. मला हिंदी चित्रपटातील fusion प्रकार खूप आवडतो म्हणुन मी त्यांच्या त्याच प्रकारच्या गाण्याबद्दल आज लिहणार आहे.

असे कमीच संगीतकार आहेत की जे असे काम करतात की त्यांची प्रत्येक कलाकृती उत्कृष्टच असली पाहिजे असा हट्ट असतो. सलीलदा त्यापैकी एक. सलीलदांचा संगीताचा प्रवास तसा १९५३ च्या फार प्रसिद्ध "दो बिघा जमीन" ने झाला. पण त्यांचा '५८ मधील "मधुमती" ह्या चित्रपटाने लोकांवर छाप पाडली. ह्यातील सर्वच गाणी अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यातले "दिल तडफ तडफके कह रहा" ऎका. (https://youtu.be/o184v83-gkk) गाण्याची सुरवात सुंदर गिटारच्या तुकड्याने होते. अंतरा सुरु झाला की संपुर्ण भारतीय ठेका, तबला आणि interlude सुरु झाले की  अजून पाश्चात्य तुकडा अशी सुंदर गुंफण त्यांच्या बऱ्याच गाण्यात दिसेल. "परख" मधील "मेरे मन के दिये" ऐका. (https://youtu.be/tkVxXZVx7l8) गाणे फार प्रसिद्ध नाही पण fusion साठी जरूर ऐका. Choral arrangement अतिशय उत्कृष्ट आहे. सलीलदा स्वतःला मोझार्टचा पुनःर्जन्म समजायचे "छाया" मधील मोझार्टच्या symphony वर आधारित "इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा" ऐका. (https://youtu.be/ClAXd0itpsA) अतिशय उत्कृष्ट fusion आहे. अंतरा मस्त भारतीय संगीत तर interlude उत्कृष्ट symphony. "आसू समझ के क्यु मुझे ऑख से तुमने गिरा दिया" ऐका (https://youtu.be/_w8KSpiLm14) भारतीय ठेका आणि पाश्चात्य संगीत ह्याची सुंदर गुंफण. सर्व interlude अप्रतिम आहेत. "माया" मध्ये सलीलदांनी अजरामर गाणी दिली आहेत. "ऐ दिल कहा तेरी मंझिल" (https://youtu.be/S199DH_hDfU) मध्ये तबल्या मागे symphony आणि interlude संपूर्ण Choral arrangement असा प्रयोग आहे. हा चित्रपट fusion गाण्यांचा खजिना आहे. "तस्वीर तेरी दिलमें जिस दिनसे उतारी हें" (https://youtu.be/cBgk0Ho0xkk) "जा रे जा रे उड जा रे पंछी" (https://youtu.be/YTMxRVtgLy4) मध्ये prelude पूर्ण पाश्चात्य बासरी तर अंतरा मध्ये तबला तर interlude मध्ये सुंदर नागांग (saxophone) असा स्वच्छंद सैराव सलीलदांनी केला आहे. "हाफ तिकीट" हा किशोरकुमारांचा चित्रपट त्यांच्या सारखाच नटखट. तसेच सलीलदांनी नटखट गाणी दिली आहेत. किशोरकुमारनी स्त्री आणि पुरुष आवाजातले गायलेले नटखट गाणे ह्याच चित्रपटातले. पण "वो इक निगाह क्या मिली" (https://youtu.be/ZYr2P9ei8PI) मध्ये लतादिदी पाश्चात्य पद्धतीने गायल्या आहेत ते ऐका. "आंखो में तुम दिल में तुम हो" (https://youtu.be/zAhFP43X5fE) पण ऐका. त्यांच्या "आनंद" चित्रपटाबद्दल काय लिहावे? सर्वच सुंदर गाणी "जिंदगी कैसी है पहेली हाये" (https://youtu.be/Psfm3s-Wmfo) मध्ये prelude मधील तुर्य (trumpet) दिल खुश करणारे आहे तर प्रत्येक interlude लक्ष देऊन ऐका master piece आहेत. "कही दूर जब दिन ढल जाये" (https://youtu.be/wjYK67cgNKc)  तितकेच fusion चे master piece आहे. रजनीगंधा मधील सर्वच गाणी fusion चा खजिना आहे. "कई बार यु ही देखा हें" (https://youtu.be/CPwbi-hfenI) मधील prelude मध्ये तुर्य (trumpet) ऐका वाह!! असाच एक सर्वांग सुंदर चित्रपट म्हणजे "छोटी सी बात" सर्वच सुंदर fusion गाणी. "न जाने क्यो होता हें जिंदगी के साथ" (https://youtu.be/F1t_Eeo-OQM) Prelude तुर्यने (trumpet) सुरु होते मग लगेच choir आणि नंतर छोटासा गोमुखचा (Euphoniums or baritone horn) तुकडा असे गजबचे combination ह्यात आहे. "ये दिन क्या आये लगे फुल हसणे" (https://youtu.be/nj9UuS-LjZw) मध्ये fusion मध्ये सतार कशी मस्त वापरली आहे. All time favorite "ओ जाने मन जाने मन तेरे दो नयन" (https://youtu.be/aAjMh5fT3TU) हे गाणे ह्याच चित्रपटातील.

ही सर्व गाणी आवर्जून ऐका आणि घरच्यांना पण ऐकवा. कोणत्या गाण्यात सारखेपणा दिसला किंवा काही pattern दिसला तर मला जरूर सांगा. असे सर्वांग सुंदर, स्वच्छ, मधुर, सर्वांचे मनोरंजन करणारे गाणी सलीलदांनी दिलीत. अशी गाणी आता दुर्मिळच. इतकी आधुनिक गाणी सलीलदांनी साठ आणि सत्तरच्या दशकात म्हणजे सुमारे ६० वर्षांपूर्वी दिलीत.

हा लेख लिहितांना मला त्यांची शुद्ध भारतीय आणि लोकसंगीतावरील उत्कृष्ट गाणी ह्यात लिहावी असा मोह होत होता. कसे तरी स्वतःला आवरले. पण मी तसे होऊ देणार नाही. ह्या गाण्यांवर लवकरच एक अजून लेख लिहणार आहे.

सतीश गुंडावार

१२-ऑक्टो-१९

जयदेव

हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीताच्या सुवर्णकाळात वेगवेगळ्या प्रतिभेचे गायक आणि संगीतकार झालेत. प्रत्येकाचे भिन्न स्थान होते आणि ते आपल्या संगीत प्रकाराला प्रामाणिक राहीले. मागच्या ब्लॉग मध्ये सलीलदा बद्दल लिहितांना त्यांच्या fusion आणि पाश्चात्य संगीत शैली बद्दल लिहले. भारतीय श्रोता, प्रेक्षक इतका प्रगल्भ आहे की त्याने हे संगीत पण डोक्यावर घेतले त्याच बरोबर शाश्वत भारतीय संगीतावर प्रेम करणाऱ्या संगीतकारांनाही डोक्यावर घेतले. एकीकडे fusion, पाश्चात्य संगीत आणि दुसरीकडे शुद्ध भारतीय संगीत देणारे संगीतकार असतांना, उपशास्त्रीय, लोकसंगीताचा वापर करणारे संगीतकार पण होते. पण जयदेव एक वेगळेच संगीतकार होते. त्यांनी भारतीय संगीत, उपशास्त्रीय आणि लोकसंगीताचा वापर केलाच पण कमीतकमी वाद्यवृंद वापरून गायकीला जास्त महत्व दिले. पाश्चात्य संगीताचा नगण्यच वापर तसाच पाश्चात्य वाद्यांचा पण नगण्यच वापर केला. जयदेव ह्यांच्या साधारण ४० वर्षांच्या कारकिर्दीत साधारण तितक्याच चित्रपटांना संगीत दिले त्यामुळे खूप लोकप्रिय नसले तरी चोखंदळ श्रोत्यांचे ते नेहमीच आवडते राहीले. त्यांच्या ह्या छोट्या कामाचे योगदान फार मोठे आहे. ते किती महान संगीतकार होते ते त्यांना मिळालेल्या तीन राष्ट्रीय पुरस्कारावरून प्रचिती येते.

जयदेवांनी संगीत प्रवास उस्ताद अली अकबर खान आणि सचिनदेव बर्मन ह्यांच्या बरोबर सुरु केली. त्यांचे ते संगीत संयोजक राहीले. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘हम दोनो’ ह्या चित्रपटाने दमदार सुरुवात केली. ह्या चित्रपटाचे सर्वच गाणी अतिशय श्रवणीय आहेत. ‘हम दोनो’ सोबतच ‘घरोंदा’, ‘गमन’, ‘आलाप’, ‘अनकही’ हे चित्रपट उल्लेखनीय आहेत. त्यांना ‘गमन’, ‘रेश्मा और शेरा’, आणि ‘अनकही’ ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. लतादिदीचे ते एक आवडते संगीतकार होते. जयदेवांनी दिदीकडून फार सुंदर गाणी गावुन घेतली. आधी सांगितल्यानुसार गायकीला प्राधान्य दिले असल्याने त्यांच्या गाण्यात लहान prelude आणि interlude दिसतात. वाद्यवृंद लहान असल्याने जयदेवांनी बासरी, सरोद, सतार, संतुर, सारंगी सारख्या मोजक्याच वाद्यांचा वापर केलेला दिसतो. दिदींनी गायलेले 'अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम', https://youtu.be/prJ9NbOycEI  'ये दिल और उनकी निगाहो के साये', 'तू चंदा मैं चांदनी', https://youtu.be/YLTdv2UyFPE आणि 'रात भी है कुछ भिगी भिगी' https://youtu.be/6sDeAi8RYMM  ही गाणी जरुर ऐका. मोहम्मद रफींनी गायलेले 'अभी ना जाओ छोड कर के दिल अभी भरा नही', https://youtu.be/C2Yu5daknUo 'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया' https://youtu.be/PbTY_m5yZ0w ही उच्च प्रतीची गाणी आहेत. मुकेशचे हे 'जब गम ए इश्क सताता है तो हस लेता हूँ' https://youtu.be/VvZ22P1In4Y दर्दभरे गाणे ऐका आणि थोडा वेळ गुणगुणत रहाल.


जयदेवांनी नवोदित गायकांना नेहमीच संधी दिली. भूपिंदरची बरीच लोकप्रिय गाणी त्यांनीच केली. 'दो दिवाने शहर में', https://youtu.be/tLC8YVxqnVU (रुना लैला सोबत) 'जिंदगी जिंदगी मेरे घर आना', https://youtu.be/KtYND8LoVYo (अनुराधा पौडवाल सोबत) 'एक अकेला इस शहर में' https://youtu.be/EpbjO-Qdfuc ही गाणी आपण ऐकली असेलच. अनुराधा पौडवालचे 'जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे' https://youtu.be/GicQ-9FICAE हे गाणे. प्रसिद्ध गझल गायिका छाया गांगुलीने कदाचित हिंदी चित्रपटात एकच गाणे गायले असेल ते पण जयदेवांसाठी. 'आपकी याद आती रही रात भर' https://youtu.be/GtCLx-W51xM हे एकच गाणे त्यांना अभिमानास्पद वाटत असेल. ह्या गाण्यात सरोद आणि बासरीचा अप्रतिम वापर आहे. अर्ध्या गाण्यात कोणताच ताल नाही आणि नंतर ताल सुरु होतो असे सुरेल गाणे आहे. सुरेश वाडकरांचे 'सिने में जलन आंखोमें तुफान सा क्यो हें', https://youtu.be/8GFYZ6IgSsk अभिताभ बच्चनने केलेला आलाप हा चित्रपट तसा दुर्दैवी म्हणावा लागेल. ह्या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत पण जास्त लोकप्रिय झाले नाही. बच्चनसाठी जयदेवांनी येसूदास वापरला आहे. 'चांद अकेला जाये सखी री', https://youtu.be/NonCqE3uJEo?t=403 'कोई गाता में सो जाता' https://youtu.be/6Lg1bLwBjLA ही दोन गाणी जरूर ऐका. जर अगोदर ऐकली नसतील तर जरूर आवडेल. रुना लैलाने गायलेले 'तुम्हे हो ना हो ... मुझे प्यार तुमसे नही है' https://youtu.be/AZXSBVWQ8wo पण अप्रतिम आहे. शेवटी पं. भीमसेन जोशींनी ‘अनकही’ मध्ये गायलेले 'ठुमक ठुमक पग कुमद' https://youtu.be/7F2wc15vcD4 हे शास्त्रीय संगीतावर आधारीत भजनाने दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळवुन दिले.

इतका प्रतिभावान संगीतकार असूनही जयदेवांना फारच थोडे चित्रपट मिळाले. जे मिळाले त्यांचे त्यांनी सोने केले. हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा अंधश्रद्धेने भरलेली आहे. त्या काळात अशी अंधश्रद्धा होती की जयदेवांनी संगीत दिलेले चित्रपट पडतात. ह्याचे बळी ते ठरले आणि आपण श्रोते त्यांच्या अजून काही कलाकृतींना मुकलो.


सतीश गुंडावार
२-नोव्हे-२०१९
 

चित्रगुप्त

हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक संगीतकारांनी खूप नाव कमावले. पण सर्वांच्या नशीबी किर्ती मिळाली असे नाही आणि हे प्रत्येक क्षेत्रात होते. पण ह्या व्यक्ती जेव्हा दूर जातात तेव्हा लोकांना त्यांची महती कळते. असेच एक संगीतकार म्हणजे चित्रगुप्तचित्रगुप्त म्हणजे 'कयामत से कयामत तक' ह्या चित्रपटाचे संगीतकार आनंद-मिलिंद ह्यांचे वडील. आत्ता तुम्हाला लगेच link लागेल. चित्रपट सृष्टीत सर्वांनाच परीश्रम करावे लागले. ते चित्रगुप्तांना पण करावे लागलेच. सुरवातीच्या काळात action films आणि low budget चित्रपटात काम केलीत पण नंतरच्या काळात मोठ्या बॅनर साठी पण काम केले. त्यांची प्रतिभा उच्च होती हे एका घटनेवरून कळू शकते. ६०-७० च्या दशकात मद्रास चे निर्माते हिंदी चित्रपट करायचे आणि उत्तम चित्रपट त्यावेळी ह्या मद्रासच्या निर्मात्यांनी केलीत. त्यापैकी एक म्हणजे AVM Production. हे जेव्हा सचिनदेव बर्मन कडे चित्रपटाच्या संगीताचे काम द्यायला गेलेत. त्याकाळी सचिनदा वर्षात फक्त चित्रपट करायचे आणि ते हा नियम काटेकोरपणे पाळायचे. सचिनदांनी आपली दिलगिरी व्यक्त केली पण त्यांना चित्रगुप्त कडे जायला सांगितले. सचिनदांची शिफारस म्हणून AVM ची लोक चित्रगुप्त कडे गेलीत. नंतर AVM आणि चित्रगुप्तने सुंदर चित्रपट तयार केलीत हा इतिहास आहे.

वैयक्तिकरीत्या मला चित्रगुप्त ह्यांच्या संगीतात नवीन किंवा वेगळेपण तसे काही दिसले नाही. ही माझी त्रुटी असेल. पण त्यांनी Double Bass ह्या वाद्यांचा वापर फारच उत्तम केला आहे. त्यांची गाणी ऐकतांना हे वाद्य जरूर अनुभवा. माझ्या मते त्यांनी त्या काळातील लोकप्रिय संगीताच्या वळणावर संगीत दिले. पण ह्याचा उलटा अर्थ काढू नयेत. स्वतंत्र शैलीत त्यांनी खूप अजरामर गाणी त्यांनी दिलीत. त्यातली बरीच चित्रपट लोक आज त्या सिनेमातील संगीतामुळे आठवतात. हे ह्यांच्या प्रतिभेचे द्योतक आहे. भाभी, में चूप रहुंगी, झबक, आकाशदीप सारखे त्यांचे चित्रपट वाखाळण्यासारखे आहेत. ह्या चित्रपटांची गाणी उत्कृष्ट आहेत. मला असे वाटते की मोहम्मद रफी कदाचित त्यांचे आवडते गायक असावेत. त्यांनी रफींकडून भरपूर गाणी गावुन घेतलीत. कदाचित रफींच्या उत्कृष्ट गाण्यामध्ये चित्रगुप्तची गाणी अधिक असतील. 'चल उड जा रे पंछी', 'इतनी नाजूक ना बनो', 'तेरी दुनियासे दूर चले होके मजबूर', 'चांद जाने कहा खो गया', 'लागी छुटे ना अब तो सनम', 'ये परबतो के दायरे', 'चली चली रे पतंग उड चली रे'. त्यांचे 'जाग दिल दिवाना रुत जागी', आणि  'मुझे दर्द दिल का पत्ता ना था' ही गाणी माझी आवडीची आहेत. रफींच्या चाहत्यांच्या यादीत ही गाणी नक्की असतील.

लतादिदीने सुद्धा चित्रगुप्त साठी फार सुंदर गाणी गायली आहेत. में चूप रहुंगी मधील 'तुम्ही हो माता पिता तुम्ही हो' हे गाणे आपल्या सर्वांचे आवडीचे आहे. तसेच त्याच चित्रपटातील 'कोई बता दिल हें जहाँ' अतिशय सुरेख गाणे आहे.  'कारे कारे बादरा', 'रंग दिल की धडकन', 'उठेगी तुम्हारी नजर धीरे धीरे', 'आजा रे मेरे प्यार के राही', 'छेडो ना मेरी झुल्फे',' दिल का दिया जलाके गया', आणि 'दगा दगा वै वै' हे तर सर्वांच्या आवडीचे आहे.

मुकेश आणि किशोरकुमारने नेमकीच गाणी गायली असतील. मुकेश ह्यांचे ''तेरी शोख नजर का दिवाना','एक रात में दो दो चांद खिले' आणि 'देखो मोसम क्या बहार हें' ही  गाणी अप्रतिम आहेत. तर किशोरकुमारची 'मचलती हुयी हवा में छम छम हमारे संग संग चले गंगा की लहरे' आणि 'अगर सुन ले तो इक नगमा' ही लोकप्रिय आहेत. शेवटी मन्ना डेंचे 'अलबेली नार प्रीतम द्वारे' हे शास्त्रीय संगीतावरील गाणे जरूर ऐका.

आज एवढेच एका गुणी संगीतकार बद्दल. तुमचे अभिप्राय जरूर लिहा. पुढे अश्याच गुणी कलाकारांबद्दल जरूर लिहीन.
 

सतीश गुंडावार
१६-नोव्हे-२०१९

जान पेहचान हो

परवा असेच YouTube surf करतांना एक विडीओ दिसला. मी title वगैरे बघितले नाही. Rock band वाटला म्हणून click केले. Band western युरोपियन होता. Prelude अप्रतिम होते म्हणून ऐकल बसलो. काही सेकंदाच मुख्य गायक हे हिंदी गाणं गायला लागला. मला मजा वाटली. त्या band ने रीतसर मोहम्मद रफी आणि शंकर जयकिशनला credit दिले होते. हे ते गाणे 

त्यावेळी आपले हिंदी संगीतकार पाश्चात्य संगीतावर 'inspire' होऊन संगीत द्यायचे. मला तसा प्रकार वाटला. मग ते original  रफींचे गाणं ऐकले. हे ते गाणे


हे 1965 च्या मेहमूदच्या गुमनाम चित्रपटातील गाण. मी चित्रपट बघितला होता पण हे गाणे लक्षात नाही राहिले. गाण्याची choreography Herman Benjamin ह्या प्रसिद्ध choreographer ने केली आहे. तो स्वतः ह्या गाण्यात गाण म्हणताना दाखवले आहे.
नंतर ह्या विडीओ खाली ह्या गाण्याच्या बऱ्याच video link दिसल्या त्या पण पाश्चात्य! विविध कलाकारांनी कल्पकतेने हे गाणं आपापल्या पद्धतीने गायले आहे. सर्व प्रकार तुम्हाला आवडतील. 





ही सर्व गाणी 2000 नंतरची. मला गंमत वाटली की 40 वर्षांनंतर हे गाणे युरोपात प्रसिद्ध व्हायचे काय कारण. तर विकीबाबांने सांगितले की हे गाणे 2001 मधील हाॅलीवुडच्या Ghost World ह्या चित्रपटाचे title ह्या गाण्यावर आहे.

हे इथेच थाबले नाही. पुढे Heineken Beer company ने हे गाणे जाहिरातीत वापरले.

https://youtu.be/57zo8O5pDXc

म्हणजे हे भारतीय लोकांनी केलेले अस्सल rock and roll गाणं आहे. धन्य ते महान शंकर जयकिशन जोडी, मोहम्मद रफी आणि Hermann Benjamin. ही गाणी ऐका आणि आपला रविवार आनंदमय घालवा.

सतीश गुंडावार
24 नोव्हेंबर 2019

Bala


मुकद्दर का सिकंदर ह्या चित्रपटात 'मेरे अंगने तुम्हारा क्या काम है?' गाणे सर्वांनी ऐकले आहे. ह्यात व्यक्तीच्या बहुतेक व्यंगावर विनोद आहे. हे गाणे समाजाच्या मानसिकतेवर वार आहे. एखाद्याला चष्मा जरी लागला तरी तो आपल्या समाजात व्यंग आहे. माझा अंदाज आहे की 70% आपण भारतीय अश्याच कोणत्यातरी व्यंगा विरूद्ध लढत असतो, लपवत असतो. अशा सर्वांना बाला हा चित्रपट नक्कीच आवडेल.

माझ्या सारख्या कृष्ण वर्णीयाला आणि टक्कल पडलेल्या माणसाला तर तो नक्कीच आवडेल. अंशुमनच्या द्विधेत कुठेतरी आपलीपण द्विधा स्पष्ट दिसत होती. गोरे दिसण्यासाठी आणि डोक्यावरचे केस वाचवण्याचे बरेच प्रयत्न पण आठवलेत. पण वास्तविकता स्विकारायला किती वेळ लागला? होय वेळ तर लागला पण चित्रपट बघितल्यावर एक आनंद निश्चितच झाला की बऱ्याच प्रमाणात वास्तविकता स्विकारण्यात मला पण जास्त वेळ लागला नाही. वयानुसार केस पांढरे होणारच पण मी रंग लावत नाही ह्याचा पण आनंदा सह अभिमान पण झाला.

चित्रपटाच्या निर्देशकाचे जितके कौतुक करावे तितके कमीच. अश्या संवेदनशील विषयावर असा मनोरंजक सिनेमा करणे आणि 2 तास प्रेक्षकांना खुर्चीला शिळून ठेवणे हे कौतुकास्पद आहे.

सर्वांनी हा चित्रपट जरूर बघावा. स्वतःच्या व्यंगावर विनोद करायला आणि स्विकारायला मदत होईल. मुलांना घेऊन जावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण काही प्रसंग प्रौढ लोकांसाठी आहे. चित्रपटाचा आवश्यक भाग आहे. पण मुलांनी काही प्रश्न विचारले तर उत्तर देणे कठीण जाईल.

मी 80% गुण देईन. भुमी पेडणेकरला एवढा मेकअप करण्यापेक्षा कृष्णवर्णीय अभिनेत्री घेतली असती तर जास्त वास्तविक वाटले असते. संगीत आजकाल बेताचेच असते त्यामुळे त्यावर भाष्य न केलेले बरे.

सर्वांनी आवर्जून बघावा असा चित्रपट. माझ्या मते आॅस्करला पाठवण्याजोगा. 

सतीश गुंडावार
17 नोव्हेंबर 2019

EPA and Anti CAA Protest


Now Citizenship Amendment Bill (CAB) has become CAA (Citizenship Amendment Act) after approval by Honorable President of India. The Hindus, Buddhists, Sikhs, Parasis and Christians of Pakistan, Afghanistan and Bangladesh now legally can apply for nationality of India. There is unrest in some parts of the country after approval of CAB in Parliament. Opponent of this act are unable to give any logical reason against this law. Interestingly, Mr. Narendra Modi has given 3 challenges to Congress Party few days back during election rally in Jharkhand. One is related to CAA. He challenges Congress to declare that CAA will be removed, if voted to power once again. Let’s not get into rhetoric of election rallies.

But let’s assume that opponent of CAA are suggesting that Muslims of these 3 countries should have been given nationality through CAA. Although, CAA does not provide such provision, Muslims of these countries can officially apply for nationality of India through other law e.g. Adnan Sami recently got Indian Citizenship. But GOI has prerogative to give it or not e.g. Taslima Nasreen is not getting Indian Citizenship last so many years. Opponent of CAA will also resist providing nationality to Taslima Nasreen. Therefore, their opposition to CAA is very much farcical.

Let’s assume that CAA would have provided citizenship to any Muslim of these 3 countries on the basis of religious prosecution (which is also a reality). During the partition of India, large number of Muslims from central India and Bengal migrated to Pakistan for better life. After barbaric episode of partition settled down, people from both the side were actually moving freely across the border. But things started changing after successive wars with Pakistan. Borders started becoming more firm and formal and free movement became difficult. After 1965 war with Pakistan, GOI headed by Congress passed the law called ‘Enemy Property Act’. Since it was passed in 1965, it became applicable to Bangladeshi after 1971. This law says the properties of Pakistani nationals in India are enemy property and therefore they belong to Government of India. Such people can’t transfer these properties to their relatives or legal heir who stayed back in India (even before 1965) or no one can go to court against government’s action as per this law. Let me share two interesting stories of this law.

The Raja of Mahmudabad Mohammad Amir Ahmed Khan, a Shia Muslim, was very close associates of Mohammed Ali Jinnah migrated to Pakistan after partition and took the Pakistani citizenship in 1957. But his wife, son and brother remained in India. As per this law, GOI took over his property in 1965. The current value of his property goes beyond 10,000 crores! The Raja moved to London after his illusion of Pakistan broken as he being Shia Muslim in Sunni majority Pakistan and died in 1973. His son Mohammad Amir Mohammad Khan, the new Raja of Mahmudabad who is Indian citizen, become his legal heir. He approached Moraraji Desai and later on Mrs. Indira Gandhi, then Prime Minister of India and requested to transfer his property back to him. 1965 law had some provisions by which govt can release these properties back to legal heir. The new Raja of Mahmudabad is Congress party leader in UP and was 2 times MLA of Congress from Mahmudabad. Union cabinet of Congress party govt discussed his request in 1980 and agreed to release 25% his property. But he has to submit proof that he is legal heir of his father. He got 25% of the property in 1980. But 75% property remained with GOI. He went to Mumbai High Court in 1997. Mumbai High Court ruled that custodian (GOI) can’t be owner and Raja is now new owner and hence the entire property should be given back to Raja of Mahmudabad. But then Congress govt challenged this decision in Supreme Court. Apex court also ruled in Raja’s favor in 2005 and asked govt to return his entire property. Raja and his family won the legal battle and acquired major part of his property. He started acquiring the properties, started investing in them for commercial purpose. But his agony being Congress party member from Congress party government did not stop there. Congress is expert in reversing Supreme Court verdict by issuing ordinance (remember Shaha Bano verdict) by President of India. In 2010, UPA govt issued an ordinance by President and taken back all the properties which were returned by Supreme Court of India. The Raja came to the same situation of 1965! BJP government extended the ordinance in 2014 once again and finally amended the act in 2015 and thus plugged all the possibilities of Raja of Mahmudabad to get his properties back. Off course, Congress opposed the amendment of this act (which is actually their ordinance) in Parliament. When this law was passed in 1965, GOI attached ~1000 properties in one year. Once heat of war with Pakistan died down, govt action also died down. When Congress Govt once again issued ordinance in 2005, the count rose to ~10,000. The count of such attached properties rose to ~15,000 in 2015 and estimated cost is 3 Lacs Crores! The amended law allows govt to auction these properties which new BJP govt is very much interested.  

Another interesting story. After the partition large number of Muslims migrated from India and similarly large number of non Muslims came to India. GOI confiscated the properties of Muslims who migrated to Pakistan under the law “Evacuee Property Act”. This act was passed on 17th April 1950. Under this law, confiscated properties of evacuee were distributed to people who came to India as refugees. One such property attached was Mumbai’s famous Jinnha house of Mohammed Ali Jinnah. This palatial bungalow at Malabar hill and spread across 2.5 acres. The current estimated value is Rs 600 Crore! Jinnha had leased out this property to British High Commission for the period from 1948 to 1983. Jinnha’s only daughter Dina Wadia, who was never agreed to her father’s idea of Pakistan, did not join him after partition and never went to Pakistan even for his funeral. She is mother of famous Industrialist Nusli Wadia. Dina Wadia went to Mumbai High Court in 2007 and appealed to handover this property to her as she is the only legal heir of Jinnah. Govt says Fatima Jinnha (Jinnha’s sister) is custodian of Jinnah’s will. But Wadias claim that this will does not have probate and hence not valid. The case is still going on. Dina Wadia died in 2017 and now Nusli Wadia is fighting this case. Interestingly, Pakistan Government also put the claim on this property. BJP govt is now suggesting to apply Enemy Property Act of 2015 to this property as well and develop it on the grounds of Hyderabad House in New Delhi.

The point is if migrated Muslims starts coming back to India and they become citizens of India, then what happens to Enemy Property Act and Evacuee Property Act. There would be flood of cases in court to return these properties back to their legal heir. Are so called liberals, who are opposing revised CAA, have any answer to this question?

 Satish Gundawar
21-Dec-2019