Saturday 24 April 2021

A Hidden Cold War

On 6th April 2021, Joint Comprehensive Plan of Action (JCPOA) meeting started in Vienna. USA, UK, France, Germany, Russia, China and Iran attended the meet. Iran and USA avoided face to face meeting. Therefore, remaining countries had to shuffle between two hotels to discuss the next action on the agreement signed in 2015. Iran wants US to remove all its economic sanctions which are not in line with 2015 JCPOA agreement. USA wants Iran to dismantle their nuclear ambition as per 2015 JCPOA. It is a positive move after Joe Biden took over as President. However, Iran does not believe that Europeans have any spine to convince USA and bring them to negotiations. When JCPOA discussions were happening on 6th April, an Iranian military ship stationed in Red sea was apparently hit by Israeli mine.


Meanwhile Iran celebrated their "Nuclear Technology Industry Day" on 10th April 2021 with big fanfare when JCPOA meet was still going on. Iran announced that they have started testing of IR-9 centrifuge. It will double their Uranium enrichment capacity from earlier IR-8 centrifuge. On the very next day on 11th April 2021, a powerful explosion took place in Iran’s most important Uranium enrichment facility in Natanz. The blast took place underneath 20 ft. cement concrete protective slab. The blast destroyed primary and secondary power supply to the enrichment centrifuge. Estimated 5000 centrifuges will go out of service for next 7 to 8 months causing tremendous delays in Iran’s nuclear program. Iran promptly blamed Israel for this sabotage and owed for revenge. Media report does not give very clear information on whether physical explosive device was used or it was cyber-attack. But important point to note that Israel could manage to penetrate 6 layers of Iranian security at Natanz nuclear facility and it was not for the first time. Israeli media did hint that Mossad was behind this incident. On the very same day (11-Apr-21), US Secretary of Defense Lloyds Austin was visiting Israel. During joint press conference between Lloyds Austin and Israeli Prime Minister Benjamin Netanyahu clearly mentioned that “I will never allow Iran to obtain the nuclear capability to carry out its genocidal goal of eliminating Israel.” (https://youtu.be/BZk2fkD05GQ) This is a clear indication that Israel may be behind Natanz-21 incidence. Israel has audaciously carried out this attack when US Secretary of Defense was visiting them. It means that US had blessing to Natanz sabotage.

But Israel-Iran cold war, which I say hidden cold war, is not new and going on last few decades. But we are so much focused on cold war between USA and Russia, that we avoid seeing other cold war going on in the world. Let’s go into past and see few incidences which is fueling this cold war further. Just 5 months back, on 27-Nov-2020, Iran’s top nuclear scientist and head of Iran’s Defense Innovation and Research Dr. Mohsen Fakhrizadeh was travelling with his wife and security convoy outskirts of Tehran. He was shot down by satellite control machine gun mounted on Nissan pickup van. Media reports say that it was AI (artificial Intelligence) enabled satellite control machine gun put on Nissan pickup van. It was parked outside of the road. It fired 14 rounds of bullet on his bulletproof car hitting 4 bullets in his forehead. His wife was sitting just 10 inches away from him and she did not get any scratch. His security officer threw himself to protect him. He also died in the incidence. A powerful blast destroyed pickup van and destroyed all the evidences completely. Iran promptly blamed Israel for this killing and owed to take revenge. Understandably, Israel did not comment on the incidence. One more clue of their involvement is there further in this article. But if media reports to be believed and Israel indeed was behind it. Then see the meticulous planning of this adventure.

Let’s go little in past in last year. General Qasem Soleimani (Head of Iran’s prestigious Quds, intelligence Operation of Iran) was second most popular figure after Grand Ayatollah Khamenei in Iran. He flew from Syrian airport using private plane of Cham Wings and landed on Bagdad military airbase on midnight of 3rd Jan 2020. It is believed that he was travelling to meet Prime Minister of Iraq. US drone flew from US’s military base in Kuwait and fired missile on his convoy with precision and killed him along with other militant leaders of Iraq. The operation was conducted by US and officially confirmed by Donald Trump. But Israel had active participation in this whole incidence. Israeli mole in Cham Airlines and Bagdad airport immediately shared exact location and key information to Mossad. Mossad immediately shared that information with US command center for this operation.

Let’s go further in past again. On 31st Jan 2018 midnight, Mossad agents conducted a raid on a warehouse in industrial area outskirts of Tehran. They cut 32 safes using gas cutting machine and stole 500 kg of Iran’s archives of nuclear program. They stole 55 thousand pages and 183 CDs. The operation took 6 hrs and 29 minutes! Mossad agents left Iran 2 hrs before next security batch arrives at the warehouse. The incident was not in public domain for 3 months. The world came to know about it when Netanyahu held a press conference on 30th April 2018 (https://youtu.be/qmSao-j7Xr4). Watch it very carefully. He says “Dr. Mohsen Fakhrizadeh, remember this name!” Now you can connect at least 2 dots! He also confirmed that private presentation was made to Donald Trump before making it public. After a week, on 8-May-2018 US, President Donald Trump (https://youtu.be/-QiMvernIL0) said that “A giant fiction that a murderous regime desires only peaceful nuclear energy program’ and they are withdrawing from JCPOA signed in 2015. Now Joe Biden is trying to revive the same agreement.

The espionage story does not end here. Let’s go further in past. A malware Stuxnet stuck Iran’s nuclear facility at Natanz. This malware infects windows machine and looks for specific target. It targets Siemens SCADA/PLC only. Malware was so intelligent that it will infect only 3 machines, if it does not find its target and also inert itself if target is not found. When this malware attacked on Natanz facility, it took control of Siemen’s SCADA and increased the speed of centrifuge for 15 mins. Iranian did not realize this abnormal behavior as it did not affect the centrifuge. But after 27 days, the malware attacked once again and reduced centrifuge speed to 50 Hz. This action damaged at least 1000 centrifuges and delayed Iran’s ambition of nuclear program a lot. This happened somewhere during Nov 2009 to Jan 2010. As we know, it is difficult to know who builds computer virus or malware. It is still not known who developed it. Whatever computers it infected worldwide, ~60% were found in Iran only. Some media reports say it was built by Israel with the help of US. Some report says, it was European countries and US built it. But interesting part is that malware exactly knew how to destroy centrifuge in cyber-attack. One can only speculate how did they do it. Rogue Pakistani Nuclear Scientist Dr. A. Q. Khan stole centrifuge design from Dutch company where he was working. Pakistan has the same design. However, rogue Dr. A. Q. Khan sold this design secretly to Iran, North Korea and Libya. Iran is/was using the same design of centrifuge. Apparently, malware developers studied Dutch centrifuge design. Israel’s Iranian mole managed to get entry into Natanz facility. He just inserted pen drive into one computer and it spread malware into the facility. Natanz facility is isolated from outside computer network. Stuxnet was dormant for some years. One day, one scientist of this facility connected his office laptop to open internet network and latest malware downloaded into his laptop. When he connected his laptop into Natanz facility, the latest and fatal malware version was spread into the facility. The rest is the history.

Israel-Iran cold war has ramifications not only in middle east but for the entire world and hence warrants focus on it. Israel, European countries and USA do not want Iran to acquire nuclear capability. Geo politics is always complex subject. Pakistan became the first Sunni Muslim country to acquire nuclear capabilities. The Sunni Muslim world is proud of it. Feud between Sunni world and Shia Iran is open secret. The same Sunni world also does not want Shia Iran to get nuclear capability. We have recently seen Donald Trump facilitated diplomatic relationship of Israel with Bahrain, UAE, Sudan and Morocco. It is predicted that Saudi will also follow the suit very soon. Media reported a clandestine meeting of Israeli Prime Minister Benjamin Netanyahu, then USA Secretary of State Mike Pompeo with Saudi crown prince Mohammed bin Salman (MBS) in Neom on Saudi Arabia’s Red Sea coast on 22-Nov-2020. I am sure Sunni world is secretly supporting Israel for its war against Iran.  

Readers may wonder that only Iran is at the receiving end and Iranians are not retaliating? Just 2 days back, Syrian missile landed near Israeli nuclear facility. Israel blames that it was a work of Iranian backed militia in Syria. What do we Indian do here? Both Iran and Israel are close friends of India and therefore just watch and enjoy unfolding drama! 

Satish Gundawar

24-April-21

Sunday 18 April 2021

रत्नभूमी गोमांतक

गोमांतक म्हणजेच गोवा तिथल्या समुद्र किनारे आणि सृष्टी सौन्दर्यासाठी प्रसिद्ध आहे. गोव्याचे क्षेत्रफळ एखाद्या जिल्ह्याएवढे पण संगीत, कला, साहित्य, नाटक ह्यातले गोव्याचे योगदान एखाद्या मोठया राज्याला लाजवेल असे आहे. विषयाच्या व्याप्तीमुळे हा ब्लॉग हिंदी चित्रपट संगीता पुरताच मर्यादित ठेवत आहे. गोव्यात पोर्तुगीज चर्च मध्ये पाश्चान्त्य संगीत सक्तीचे होते. त्यामुळे गोव्यात पाश्चान्त्य संगीत आणि वाद्य येणाऱ्यांची खुप मोठी संख्या होती. जॅझ संगीत भारतात तसे लगेच आले आणि १९४५ च्या सुमारास चित्रपट संगीतात यायला लागले. मुंबई हे असे melting pot आहे की जिथे सर्व संस्कृती आल्या, रुजल्या आणि पल्लवित झाल्या. सुरुवातीला जॅझ वादक परदेशातून यायचे. नंतर हळुहळु गोव्यातले वादक त्यांची जागा घेऊ लागले.  भारतीय संगीत हे Melody आणि Rhythm ने परिपूर्ण पण harmony चा अभाव. पण पाश्चान्त्य संगीत आणि जॅझ मध्ये harmony महत्वाची असते. भारतीय संगीतात पाठांतरावर भर तर पाश्चान्त्य संगीतात staff notation चा वापर. जसे जसे हिंदी चित्रपट संगीताचे संगीत भव्य होत गेले तस तसे ह्या संगीतकारांना संगीत लिहण्याची गरज भासू लागली. गोव्यातले वादक staff notation लिहण्यात आणि वाचण्यात तरबेज होते. त्या सुवर्ण काळातील सर्वच संगीतकार हे भारतीय संगीताचे मोठे जाणकार होते. त्यांना ह्या गोव्यातल्या पाश्चान्त्य संगीतात प्रशिक्षित वादकांची साथ लाभली आणि एक जागतिक संगीताचा जन्म झाला. World Music हा शब्द जगात प्रचलित व्हायच्या आधीच हिंदी चित्रपटात World Music किंवा Fusion Music १९४५-५० च्या काळात स्थिर झाले होते.

१९४५ ते १९९० पर्यंतची गाणी आपण आजही आवडीने ऐकतो. त्यातली कधी काही वाद्य किंवा संगीत रचना मनावर कायमची कोरली जाते. कित्येक गाण्याचे intro सुरु झाले तरी आपल्याला गाणे आठवते. हिंदी चित्रपट संगीत हे गीतकार, संगीतकार आणि गायक ह्यांना मान्यता देते. पण ज्या वादकांनी ते गाणे वाजवले त्यांची नाव सहसा कोणाला माहित नसते. ‘बचना है हसींनो’ च्या सुरुवातीला trumpet चा सुंदर intro आहे. तो कोणी वाजवला हे विचारले तर तो बऱ्याच जणांना माहीतच नसते. ह्या वादकांच्या आणि संगीतकारांच्या मध्ये अजून काही लोक म्हणजे Music Assistant, Music Arrangers आणि Music Conductors असतात. ह्यांचे काम संगीतकाराने सांगितलेल्या चालीला संगीताने सजवायचे. Intro, Prelude, interlude तयार करायचे, त्यासाठी वाद्यांची निवड करायची, त्यांचा मेळ साधायचा, notation लिहायची, वादकांकडून सराव करून घ्यायचा आणि final recording ला ते conduct करायचे. इतके महत्वाचे योगदान करणाऱ्या ह्या Music Arrangers चे आणि वादकांचे नाव सहसा कोणाला माहित नसते किंवा ह्याची साधी कुठे नोंद असते. १९४५ ते १९९० च्या काळात गोव्याच्या Music Arrangers आणि वादकांचा हिंदी चित्रपट सृष्टीत दबदबा होता. अश्या अनामिक लोकांबद्दल लिहण्याचा हा माझा छोटा प्रयत्न.

ह्या यादीत सर्वात पहिले जर कोणाचे नाव घ्यावे तर ते ऍंथोनी गोंझाल्वेस ह्यांचे घ्यावे लागेल. स्वतः उत्तम व्हायोलिन वादक. नौशाद ह्यांच्या बरोबर arranger म्हणून खुप काम केले. तिथे त्यांना भारतीय संगीतातल्या melody आणि rhythm ने आकर्षित केले. पुढे त्यांनी भारतीय रागांवर symphony तयार केल्यात. हे गोव्यातून आलेले आद्य arranger म्हणावे लागेल. ह्यांच्या कामामुळे इतर संगीतकार गोव्यातल्या वादकांकडे वळलेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचा सन्मान एवढा होता की ‘अमर अकबर ऍंथोनी’ ह्या चित्रपटातील "My Name is Anthony Gozalves” हे गाणे प्यारेलालने आपल्या गुरूला समर्पित केले आहे. ऍंथोनी गोंझाल्वेस ह्यांनी संगीतकार प्यारेलाल आणि आर. डी. बर्मन ह्यांना आणि अनेक जणांना व्हायोलिन शिकवले.                 

जॉनी गोम्स आणि जो गोम्स हे दोघे बंधू संगीतकार सि. रामचंद्र ह्यांचे music arrangers. ही दोघे संगीतकार चित्रगुप्त ह्यांचे पण music arrangers होते. दोघे उत्तम Violin, Clarinet आणि Alto Saxophone वाजवायचे. १९५० च्या नंतरची सि. रामचंद्र आणि चित्रगुप्तची गाणी ऐकली तर त्या गाण्यात harmony नक्की ऐकायला मिळेल. गाण्यात cello किंवा double bass चा वापर harmony साठी नक्की दिसेल. तेव्हा पासून हिंदी गाण्यात melody, rhythm आणि harmony हे तिन्ही ऐकायला मिळायला सुरुवात झाली. जॉनी गोम्स आणि जो गोम्स ह्यांनी arrangement केलेली बरीच चित्रपट आहेत. काही गाणी पुढे लेखात येतीलच.

शंकर जयकिशन ह्यांना सुरुवातीला सनी कॅस्टेलिनो ह्या arranger ने मदत केली. ‘आग’,बरसात’ मध्ये त्यांनी बहुदा music arrangement केली असावी. त्यांनी . पी. नय्यर ह्यांचे पण संगीत संयोजन केले. ‘पुछोना हमें हम उनके लिये’ ह्या गाण्यातला पियानो त्यांनीच वाजवला आहेपुढे १९५२ मध्ये सनी कॅस्टेलिनोने त्यांचा मित्र सेबास्टियन डिसुझा ह्यांची शंकर जयकिशन सोबत ओळख करून दिली.

येथून हिंदी चित्रपट संगीताच्या नवीन इतिहासाला सुरुवात झाली. सेबास्टियन डिसुझाने अगदी शेवट पर्यंत शंकर जयकिशन ह्यांना music arrangement करून दिली. त्यांनी . पी. नय्यर आणि सलील चौधरी ह्यांना पण music arrangement करून दिली. तब्बल १७५ चित्रपटांचे music arrangement आणि पार्श्वसंगीत त्यांनी दिले. आधी सांगितल्यानुसार ह्या गोव्यातल्या वादकांनी हिंदी गाण्यांना harmony दिली. ‘मेरा नाम चीन चीन चू’ (https://youtu.be/cQjXKdyp_wM) हे गाणे ऐका. Double bass चा वापर harmony साठी केलेला आहे. पण सेबास्टियन बऱ्याच नवीन गोष्टी दिल्यात. त्यांनी counter melody हिंदी गाण्यात पहिल्यांदा आणली. मुख्य melody च्या बरोबर मागे अजून एक उप melody असते त्याला counter melody म्हणतात. हा पाश्चिमात्य प्रकार सेबास्टियनने हिंदी गाण्यात आणला. 'रात के हमसफर' (https://youtu.be/OPaUm-UxdhY) ह्या गाण्याचा intro बारकाईने ऐका. तुम्हाला counter melody ऐकायला मिळेल. कोरस आणि violin ह्यांची melody ही त्यांची दुसरी देण. ‘दिल के झरोके में तुजको बिठाकर’ (https://youtu.be/v9BfZf1x5ZU?t=14) हे गाणे तसे landmark गाणे ते पुढे सांगीलच. पण ह्या गाण्यात सेबास्टियनने counter melody, कोरस आणि violin ची melody वापर केल्याचे उत्तम उदाहरण आहे. ह्याचे थोडे जुने उदाहरण म्हणजे 'आ अब लौट चले' (https://youtu.be/H8Fu_O7y-dg) हे ऐतिहासिक गाणे आहे. String section, brass section, rhythm, कोरसचा वापर करत melody आणि harmony असलेले परीपूर्ण गाणे आहे. गाण्याच्या शेवटी शेवटी grand music arrangement आहे. हे १९६१ सालचे गाणे आहे! असे संगीतबद्ध केलेले गाणे आता दाखवा. सेबास्टियनने फक्त पाश्चिमात्य संगीत तयार केले असे नाही. भारतीय संगीताचा पण सुंदर वापर त्यांनी त्यांच्या arrangement मध्ये केला. 'आजा रे परदेसी’ (https://youtu.be/Mm21SSgUHe8) हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जसे अगोदर सांगितले त्यांनी ओ. पी. नय्यर आणि सलील चौधरी सोबत पण काम केले. पण ह्या तिघांच्या संगीतात सारखेपणा येवू दिला नाही. सेबास्टियनने केलेली arrangement पुढे हिंदी चित्रपट संगीतात template बनली. नंतरच्या संगीत arrangement ही template तुम्हाला वारंवार दिसेल.

सेबास्टियनचे नाव घेतले तर त्या बरोबर दत्ताराम वाडकर ह्यांचे नाव लगेच घ्यावे लागेल. दत्ताराम पण गोव्याचे. सेबास्टियन बरोबर दत्तारामने शंकर जयकिशनसाठी arrangement केली. दत्ताराम संगीतकार शंकरचे चांगले मित्र होते. त्यांनी पृथ्वी थिएटर पासून एकत्र काम केले होते. पुढे जेव्हा शंकर जयकिशन स्वतंत्र संगीत देऊ लागले तेव्हा पासून तर अगदी शेवट पर्यंत दत्तारामने शंकर जयकिशनसाठी संगीत संयोजन केले. दत्ताराम स्वतः उत्तम तबला आणि ढोलक वाजवायचे. सेबास्टियन String section आणि brass section तर दत्ताराम rhythm section सांभाळायचे. वर दिलेल्या गाण्याचे rhythm arrangement दत्तारामने केले आहे. पुढे दत्ताराम स्वतंत्र संगीतकार झाले. पण शंकर जयकिशन ह्यांना कधीच सोडले नाही. दत्तारामने स्वतंत्र संगीतकार म्हणून 'अब दिल्ली दूर नही' ह्या चित्रपटाचे संगीत दिले. त्यातले ‘चुन चुन करती आयी चिडिया’ (https://youtu.be/CsL82QnlqlM) हे गाणे महत्वाचे म्हणावे लागेल. ह्यातला ठेका (rhythm) ऐका. पुढे जाऊन हा ठेका हिंदी चित्रपटात खूप गाजला. ह्या ठेक्याला आजही दत्ताराम ठेका म्हणूनच ओळखले जाते. संगीतकार म्हणून त्यांची बरीच गाणी गाजली. 'न जाने कहा तुम थे' (https://youtu.be/wU1pdUUhmkg) हे ऐकले आहेच. ‘आसू भरी ये जीवन की राहें’ (https://youtu.be/9UE-LcQ5NNg) हे गाणे पुढे लतादीदींनी 'My Tribute' ह्या album मध्ये गायले आहे. त्यावरून ते किती प्रतिभावान होते ह्याची प्रचिती येते. ‘हाल ए दिल हमारा’ (https://youtu.be/ITG7Y6eJY4A), ‘मस्ती भरा है समा’ (https://youtu.be/fbXiAJT4Bzs), मिठी मिठी बातोसे बचना जरा (https://youtu.be/RsH24zE_oHI) ही काही त्यांची अप्रतिम गाणी. त्यांनी १५ ते १८ चित्रपटांना संगीत दिले आणि जवळ जवळ सर्व संगीतकारांसाठी ताल वाद्य वाजवले.

आता मराठी माणसाचे नाव आलेच तर अजून एक नाव. एन. दत्ता (दत्ता नाईक) हे अजून एक गोव्याच्या मातीतून निघालेले रत्न. सुरुवातीला सचिनदेव बर्मनची music arrangement केली. ते गुलाम हैदर ह्यांचे पण संगीत संयोजक होते.  पुढे ते स्वतंत्र संगीतकार म्हणून बरेच काम केले. मराठी रसिकांना त्यांची मराठी गाणी माहीतच आहेत. पण त्यांची काही निवडक हिंदी गाणी, 'मैं तुम्हीसे पुछती हू मुझे तुमसे प्यार क्यो है' (ह्या गाण्यातली अभिनेत्री मेहमूद ची बहीण आहे बरे का!) (https://youtu.be/aYUdzZUkKbQ), ‘धडकने लगी दिल की तारो की दुनिया’ (https://youtu.be/9d4EeM7X1Ng?t=10), ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ (https://youtu.be/9urIZUwblKg?t=5), ‘संभल दिल’ (https://youtu.be/6LYN6XIt8Hs?t=5) आणि बरीच अशीं सुंदर गाणी त्यांनी दिलीत.

गोव्याचे अजून एक महान music arranger म्हणजे फ्रॅंक फेर्नांडिस (फर्नाड). त्यांनी अनिल बिस्वास, शंकर जयकिशन, रोशन, सि. रामचंद्र, कल्याणजी आनंदजी सोबत काम केले. एकंदर ८० चित्रपटाचे संगीत संयोजन त्यांनी केले. डॉन, जंजीर, हेर फेरी, जॉनी मेरा नाम ही काही त्यांची निवडक चित्रपट.

आत्तापर्यंत music arrangers बद्दल लिहले. काही एकल (solo) वादन करणारे वादक गोव्यातून आले. पियानो, trumpet, saxophone, violin, drum वाजवणारे legends गोव्यातून आलेत. गोव्याच्या धरतीतून बरेच pianist आलेत. त्यात रॉबर्ट कोरिया ह्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेलमागेदिल के झरोके में तुजको बिठाकर’ हे landmark गाणे आहे असे लिहले होते. ह्या गाण्याचा intro दिड मिनिटांचा आहे! एवढा मोठा intro क्वचितच ऐकायला मिळतो. हे गाणे पियानोचे landmark गाणे मानले जाते. पियानोसाठी हे गाणे अजून एकदा ऐका. ह्या गाण्यात पियानो रॉबर्ट कोरिया ह्यांनी वाजवला आहे. ‘मुझे तुम मिल गये हमदम’ (https://youtu.be/lVh-7uFaFwA) ह्या गाण्यातला पियानो त्यांनीच वाजवला आहे. माईक मचाडो अजून एक पियानिस्ट होते. त्यांनी 'प्यार दिवाना होता है' (https://youtu.be/lslZptXok8o) ह्या गाण्यात पियानो वाजवला आहे. सनी कॅस्टेलिनो बद्दल आधीच लिहले आहे.

Trumpet हे अतिशय गोड वाद्य आहे. Brass section मधील महत्वाचे वाद्य. अगदी सुरुवातीपासून हिंदी गाण्यात हे वाद्य आपण ऐकले आहे. गोव्यातून trumpet वाजवणारे खूप वादक आलेत. त्यात Chic Chocolate (Antonio Xavier Vaz) हे अग्रणी मानावे लागेल. सि. रामचंद्र ह्यांच्या बऱ्याच गाण्यात त्यांनी trumpet वाजवला आहे. त्यांनी मदन मोहन, खय्याम सोबत पण काम केले आहे. ‘अलबेला’ ह्या प्रसिद्ध चित्रपटातील ‘दिवाना परवाना’ (https://youtu.be/xfhqnxrIabE) ह्या गाण्यात त्यांनी muted trumpet वाजवला आहे. ह्या गाण्यात मागे trumpet वाजवतांना जे दिसतात ते Chic Chocolate आहेत. त्यांचा स्वतःचा स्वतंत्र जॅझ बँड त्यावेळी होता आणि तो खूप प्रसिद्ध होता. हे गाणे हिट झाल्यावर ह्या गाण्यातला costume त्यांचा बँड घालायचा. ‘गोरे गोरे ओ बाके छोरे’ (https://youtu.be/WkErlBw-8_k), ‘इना मीना डिका’ (https://youtu.be/Se1EZCE_zLo) ह्यात पण त्यांनीच trumpet वाजवला आहे. ‘रुत जवान जवान’ (https://youtu.be/4JeLUNj80yU) ह्या गाण्यात पण Chic Chocolate ह्यांचे close-up आहेत. एवढा सन्मान त्या काळात त्यांना होता. (भूपिंदर सिंग ह्यांचे हिंदी चित्रपट कारकिर्दीतील हे पहिले गाणे आणि गाणे पण त्यांच्यावरच चित्रित केले आहे.) Chic Chocolate ला समकालीन पण नंतर बरेच वर्ष काम केलेले क्रिस पेरी. Trumpet आणि alto saxophone वाजवणारे. संगीतकार खय्याम ह्यांचे 'कभी कभी', 'त्रिशुल' ह्या चित्रपटात संगीत संयोजक म्हणून काम केले. लक्ष्मीकांत प्यारेलाल, पंचम बरोबर पण खूप काम केले. Trumpet वादकात जॉर्ज फेर्नांडिस ह्यांचे नाव घेतल्या शिवाय ही यादी पूर्ण होऊ शकत नाही. 'बचना है हसींनो' (https://youtu.be/9HVI7TPWiJM) ह्या गाण्याच्या intro मध्ये एक मोठा trumpet चा तुकडा आहे जो त्या चित्रपटाची एक signature tune म्हणून प्रसिद्ध झाला. ‘चुरालिया है तुमने जो दिल को’ (https://youtu.be/_R7Po4Wpbj8), ‘आने वाला पल, जाने वाला है’  (https://youtu.be/xobeTscjOM0?t=10) जॉर्ज हे पंचम ह्यांच्या ग्रुप मधील कायमचे सदस्य होते. शोले, तिसरी मंझिल, हम किसीसे कम नही, सागर, बॉबी, आनंद सारख्या चित्रपटात त्यांनी trumpet वाजवले आहे.


लेखाच्या शेवटी Bass Guitar वाजवणारे टोनी वाझ. आर. डी. बर्मन ह्यांच्या टीमचे प्रमुख वादक. आज Bass Guitar वाजवणाऱ्यांचे Idol. पंकज कांथ ह्याने त्यांच्या सन्मानार्थ एक series केली आहे. Bass Guitar चा सर्वात चांगला उपयोग आर. डी. बर्मनने केला आणि त्याचे संपूर्ण श्रेय टोनी वाझ ह्यांना द्यावे लागेल. Bass Guitar चा मूळ उपयोग harmony देण्यासाठी होतो पण पंचमने त्याचा rhythm आणि melody साठी केला. रॉकी, इजाजत, सत्ते पे सत्ता आणि अनेक चित्रपटातील गाण्यात टोनी वाझने Bass Guitar वाजवले आहे. Bass Guitar ची मजा original sound track मध्येच येते म्हणून sound track देत आहे आणि headset महत्वाचे. साध्या speakers मध्ये Bass Guitar चा आवाज येतच नाही.

Bass Guitar चे सर्वात सुंदर गाणे म्हणजे रॉकी ह्या चित्रपटातील 'क्या यही प्यार है' (https://youtu.be/9z6EEprP4rA), ‘मेरा कुछ सामान’ (https://youtu.be/znqL717vigw), ‘सत्ते पे सत्ता’ मध्ये खूप गाण्यात bass guitar आहे पण ‘दिलबर मेरे कब तक मुझे’ (https://youtu.be/LI84IvrQ8Nc) सुरेल आहे. ‘जान ए जा ढुंडता फिर रहा’ (https://youtu.be/ocb-UQtl854), ‘तू तू है वही’ (https://youtu.be/9cDN-s8mLvU) ही त्यांची काही विशेष गाणी.

ह्या लेखात दिलेल्या माहितीची सत्यता पडताळणे अतिशय कठीण आहे. ह्याचे कारण की ह्यांची नोंद कुठेही ठेवली गेली नाही. म्हणून ही माहिती ऐकीव आहे. शोले चित्रपटात Harmonica (Mouth Organ) चा piece सर्वांना माहित आहे. तो मी वाजवला आहे असे म्हणणारे दोन तीन जण आहेत.

ह्या मंडळींची आठवण किंवा त्यांच्या बद्दल आदर ह्यासाठी असला पाहिजे कारण कित्येक intro, interlude, prelude हे music arrangers ने तयार केलेले असतात पण नाव संगीतकाराचे होते. तसेच एकल (solo) वादन करणारे वादक हे स्वतः ठरवायचे की काय वाजवायचे. संगीत संयोजक सुरुवात ह्या स्वरापासून करायची तर ह्या स्वरावर सोडायचे इतकेच ह्या गुणी वादकांना सांगायचे. मग हे वादक पुर्ण piece स्वतः ठरवायचे. टोनी वाझला composition सांगितले की ते स्वतः bass guitar चे notation लिहून स्वतःच्या मनाने वाजायचे. त्यामुळे त्यांच्या वाजवण्याचे notation मिळत नाही. पंकज कांथ सारख्याने reverse engineering करून notation शोधून काढलेत.

ही तर खूपच लहान यादी आहे. अजून असे अनेक वादक आहेत. Martin Pinto, C. Franko, Albert D’costa, Arthur Pareira, Francis Vaz (drum), Monsorate Brothers (Ronnie – Piano, Joseph – Trumpet, Bosco – Trumpet, Blasco – Trombone) आणि शेकडो violin वादक ह्यांच्या बद्दल फारशी माहिती मिळत नाही.

हे झाले वादक. पण गायकांमध्ये हेमा सरदेसाई, रेमो फेर्नांडीस आणि भारताला लागलेले स्वप्न असे सर्व मंगेशकर कुटुंब गोव्याचेच ना! ह्या गोव्याच्या कलाकारांनी फक्त मुंबईत काम केले असे म्हटले तर चुकीचे ठरेल. फाळणी आधी कराची, लाहोर मध्ये पण हेच वादक होते. नंतर कलकत्ता, मद्रास इथल्या संगीत सृष्टीत हेच कलाकार होते. ह्यात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील यादी टाकली तर? पं. तुलसीदास बोरकर, प्रभाकर कारेकर, मोगुबाई मुर्डीकर, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी आणि सर्वात श्रेष्ठ मा. दीनानाथ मंगेशकर हे गोव्याचेच. गोव्या सारख्या एवढ्या छोट्या राज्याचे हे संगीतातील योगदान अचंबित करणारे आहे. ह्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रपंच!


सतीश गुंडावार

१८-एप्रिल-२०२१

Tuesday 13 April 2021

संपूर्ण सिंग कालरा

नाव जरा ऐकले वाटत नाही ना? १९६३ पासून (~ ६० वर्षे) हिंदी चित्रपट सृष्टीत सतत काम करणारे ज्यांना आत्तापर्यंत २२ फिल्म फेअर, नॅशनल अवॉर्ड, ग्रॅमी, ऑस्कर आणि सर्वात मानाचा दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालेले असे. १३३ चित्रपटांना गीत, ६९ चित्रपट कथा, १७ चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे. अगदी classical गाण्यांपासुन, अंगाई गीत, आधुनिक item songs पासून तर ते जय हो सारख्या आंतरराष्ट्रीय गीतापर्यंत गीत लिहिणारे. काहींनी आत्तापर्यंत ओळखले असेलच. चित्रपट सृष्टीत उत्युन्ग कामगिरी आणि त्याच प्रमाणे चित्रपट सृष्टीच्या बाहेर पण तेवढीच मोठे काम करणारे सर्वांचे आवडतेगुलझार’. गुलझार ह्यांना दोन पानात बसवणे म्हणजे सूर्याला काजवे दाखवणे म्हणावे लागेल. भारतीय संगीतावर आधारित, ज्यात गायकीवर, काव्यावर भर, गाण्यात प्रेम, श्रुंगार, दर्द, विरह, व्यथा समर्पक रीतीने मांडणारे गुलझार स्त्री मनाच्या अंतरंगाचे वर्णन एखाद्या स्त्रीला लाजवेल असे केले आहे. त्यांनी मदन मोहन, एस. डी. बर्मन, जयदेव, आणि आधुनिक संगीतकारापैकी विशाल भारद्वाज अश्या अनेक संगीतकारांसोबत काम केले. पण त्यांचे पंचम म्हणजेच आर. डी. बर्मन सोबत केलेले काम काही विशेष आहे. हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळापासून आजही काम करणारे फार कमी लोक आता उरले आहे. त्यात गुलझार अग्रेसर आहेत.   

गुलझार ह्यांचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या हजार पैलू पैकी एक पैलूवर जर लिहले तरी मोठा लेख होईल. त्यांच्या हजारो गाण्यातून काही निवडक गाणे काढणे म्हणजे त्यांच्या उरलेल्या गाण्यांवर अन्याय करणे होय. गुलझार ह्यांनी शब्द रचना आणि शब्दाचा खेळ अत्यंत अलंकारिक पद्धतीने केला आहे. जे शब्द त्या ठिकाणी सामान्य रसिक कल्पना करू शकत नाही किंवा दोन शब्द एकत्र कसे येऊ शकतात पण गुलझारने नेमके तेच केले. स्त्री मनाची गुंतागुंत गुलझारने बाकीच्या गीतकारांपेक्षा वेगळ्या पद्धतीने केली. नवऱ्याच्या दुसऱ्या स्त्री बरोबर झालेल्या मुलाकडे बघताना तीचे मन काय म्हणेल? 'मुस्कुराये तो मुस्कुरानेके कर्ज उतारने होंगे' पुढे ह्या गाण्यात ती म्हणते 'जैसे होटोंपे कर्ज रखा हैं'. (https://youtu.be/b04C6hKGLXA). त्याच गाण्याचा उपयोग त्या नवऱ्यासाठी पण गुलझारने केला आहे. जो भावनेच्या भरात त्याची निशाणी मागे ठेवून गेला. पण ती निशाणी अचानक डोळ्यासमोर आल्यावर त्याची भावना काय असेल? पत्नीची आणि नवऱ्याची एकाच घटनेची विभिन्न भावना एकाच गाण्यात दाखवण्याची करामत गुलझारनेच करावी. पती-पत्नीचे एकमेकांवर अत्यंत प्रेम पण परिस्थितीने दूर गेलेले जोडपे समोरासमोर आल्यावर काय संवाद करतील? 'कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राहे', पण मला तुझ्याजवळ यायचे आहे तर ती म्हणते. ‘इन रेशमी राहो में इक राह तो वो होगी जो तुम तक पहुचती हैं’ (https://youtu.be/STOM6NZfcrs). त्यावर तिचा पती म्हणतो. 'तुम जो कह दो तो आज की रात चाँद डुबेगा नही .... रात को रोक लो' (https://youtu.be/8-HnmVg0-O8). एकीकडे विभक्त जोडप्यांची व्यथा तर दुसरीकडे एकमेकांच्या अत्यंत प्रेमात पडलेल्या पती-पत्नीची भावना. 'बोलो देखा हैं कभी तुमने मुझे उडते हुये', पुढे त्याच गाण्यात ती म्हणते ‘लगी आंखो को देखा हैं कभी उडते हुये' (https://youtu.be/MqCzyGLxQeQ). त्याच चित्रपटात अजून अशीच भावना व्यक्त करणारे गाणे आहे. 'आपसे भी खुबसुरत आपके अंदाज हैं' पुढे त्याच गाण्यात ‘आपकी खामोशिया भी आपकी आवाज हैं' (https://youtu.be/NbqCWwlNKrA).

विरहातली स्त्री असेच काही तरी विचार करत असेल. 'टूटी हुयी चुडीयोंसे जोडू ये कलाई' ह्याच गाण्यात पुढे ती म्हणते 'पैरो में ना साया कोई सर पे सायी रे' (https://youtu.be/zgC3-E36bwg). प्रियकराच्या प्रेमात पडलेली प्रेयसीच्या भावना गुलझारने नेमक्या शब्दात मांडल्या आहेत. 'जीना भुले थे कहा याद नही' पुढे ह्याच गाण्यात 'वक्त से कहना जरा वो ठेहेर जाये वही' (https://youtu.be/MQJYSZ2izIM) अश्या भावना गुंफल्या आहेत. कानू रॉय ह्या प्रतिभावान संगीतकाराने गीता दत्त ह्यांच्या कडून गावुन घेतलेल्या ह्या गाण्यात प्रेयसीची भावना, 'दो बुंदे ना बरसे इन भीगी पलको', पुढे त्याच गाण्यात 'दो जुडवा होटो की बात कहो आंखो से' (https://youtu.be/F6FkVPOMtvM) अश्या शब्दात गुंफली आहे. इजाजत मधील ह्या गाण्यात 'बारिशो की पानी से सारी वादी भर गयी' पुढे त्याच गाण्यात नायिकेच्या व्यथा 'बुंदो में पानी था पानी में आसू थे' (https://youtu.be/3wmmqnoW_us) अश्या शब्दात लिहिल्या आहेत.

गुलझारने पुरुष मनाच्या भावना, व्यथा, प्रेम तितक्याच अलंकारिक पद्धतीने मांडल्या आहेत. एक ड्राइवरच्या रस्त्याबद्दल नेमक्या काय भावना असतील? 'उडते पैरो के तले जब बहती हैं जमी', पुढे ह्याच गाण्यात 'मुडके हमने कोई मंजिल देखी ही नही', आणि जेव्हा इथे विसावा घ्यावा असे वाटले तर 'बस्तियो तक आते आते रस्ते मुड गये' (https://youtu.be/CpYuH4Cc8Mk). एका प्रियकराची व्यथा 'एक बार यु मिली मासुम सी कली', पुढे त्याच गाण्यात 'एक बार वक्त से लम्हा गिरा कही' (https://youtu.be/xobeTscjOM0?t=10) अश्या शब्दात गुंफली आहे. अजून एका गाण्यात ‘दिन खाली खाली बर्तन और रात हैं जैसे अंधा कुवा', गुलझारचा प्रियकर रडतो पण तो म्हणतो 'आसू की जगह आता हें धुआ' (https://youtu.be/EpbjO-Qdfuc). हृदय तुटलेल्या प्रियकराचे मनोगत ह्या गाण्यात ठासून भरलेले आहे. 'पानीयो में बह रह हैं कई किनारे टूटे हुए' (https://youtu.be/vHGHzYFzr-E?t=7). प्रेयसीची आतुरतेने वाट बघणारा प्रियकर आपली भावना कशी मांडेल? 'सांस लेते हैं जिस तरह साये', पुढे त्याच गाण्यात 'जैसे खुशबु नज़र सें छू जाए', पुढे त्याच गाण्यात 'वक्त जाता सुनाई देता हैं' (https://youtu.be/VfaqM5wfCY0) अश्या शब्दात ती भावना गुंफली आहे.

गुलझारवर प्रेम करणारा एक वेगळाच रसिक वर्ग आहे. तो अशी असंख्य गाणी सांगू शकतो. गुलझार सारख्या हिमालयाच्या आकाराच्या कवीला दोन पानात सामावण्याचा गुन्हा मी केला आहे. पण तो प्रेमाने स्वीकारावा.

 

सतीश गुंडावार

१३ एप्रिल २०२१ 

Saturday 10 April 2021

अष्ट पुत्र सौभाग्यवती भव

काही वर्षांपुर्वी रा. स्व. संघाचे त्यावेळचे . पु. सरसंघचालक श्री सुदर्शनजी म्हणाले की प्रत्येक हिंदु कुटुंबाला अपत्य असावीत. त्यावेळी तथाकथित पुरोगामी माध्यमाने त्यांच्यावर खुप टिका केली. देशाची लोकसंख्या इतकी वाढत आहे की लोकसंख्येचा स्फोट होत आहे आणि सुदर्शनजी अपत्याचा सल्ला देत आहेत. मला मा. सुदर्शनजींच्या वक्तव्यात काही टिका करण्यासारखे वाटले नाही. ते समाज हिताचे विधान होते असे मला त्यावेळी वाटले. पुढे एकदा मा. भागयाजींने (रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकर्ते) सुध्दा एका वैयक्तिक चर्चेत हाच विषय मांडला. ते म्हणाले ज्या घरी एक अपत्य त्या घरात नेहमी असुरक्षितता असेल, दोन अपत्य असतील तर समाधान आणि तीन अपत्य असतील तर कुटुंबात सुख, समाधान, आणि आनंद नांदेल. आम्ही चार भावंडे असल्याने मा. भागयाजींच्या मताशी अनुभवावरून मी लगेच सहमत झालो. तसाही मी एक अपत्य कुटुंब पद्धतीचा नेहमीच विरोधक राहिलो आहे. गेले दोन पिढ्यांपासून आलेले हे खूळ समाज स्वास्थाला घातक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

सध्याच्या कोरोना महामारीत मा. सुदर्शनजींच्या वाक्याची प्रखर आठवण होते. परवा माझा एक मित्र त्याच्या सहकाऱ्यांची व्यथा सांगत होता. त्या सहकाऱ्यांचा तरुण मोठा भाऊ आणि वहिनी दोघेही कोरोनात गेले. आता त्याच्यावर भावांच्या दोन लहान मुलांची जबाबदारी आली आहे. त्यात त्याची दोन मुलगे आहेत. चार मुलांची संपुर्ण जबाबदार त्यावर आली आहे. घरोघरी कोरोनाच्या प्रकोपाची कथा ऐकायला मिळते. माझ्या नातलगात वडील, त्यांची दोन होतकरु मुले कोरोनाने काही दिवसांच्या अंतराने गेलेत. कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी आता घराच्या महिला आणि तरुण मुलांवर पडली आहे. पोरके होणे हे कोणत्याची वयात फारच वेदनादायक, दुःखदायक असते. आई वडिलांचे छत्र हे परमेश्वराचा आशिर्वाद असतो. ते कोणत्याही वयात जाणे हे दुर्दैव्यच. त्यात बालपणी किंवा तरुण वयात आई किंवा वडिल किंवा दोघेही जाणे ह्या सारखे मोठे दुःख आणि संकट कोणते नाही. मी विचार करत होतो. माझ्या माहितीतील ज्या ज्या कुटुंबावर कोरोनाचे संकट आले ते कुटुंब एक अपत्य कुटुंब असते तर त्या मुलावर किती मोठे संकट आले असते. पालकांची संपत्ती, बँक ठेवी, आयुर्विमा काय कामाचे? ती कुटुंब मोठी असल्याने हा आघात सहन करण्याची काही तरी ताकद त्या कुटुंबामध्ये आहे. आज काका, मामा, आत्या, मावशी आहेत तर ते काही तरी त्या मुलांची जबाबदारी घेतील ह्याची शक्यता आहे.  

एकदा विश्व हिंदु परिषदेच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांने अनाथ मुलाची समस्या किती गंभीर आहे ह्याचे वर्णन मला सांगितले ते आठवले. अनाथालय भारतीय संस्कृतीला तशी नवीन संकल्पना. ख्रिश्चन मिशनरींना धर्म प्रसाराला लागणारी उपयुक्त योजना म्हणून त्यांनी भारतात आणली तरी सुद्धा समाजोपकारी आहे हे मान्य. समाजात निपुत्रिक कुटुंबामध्ये दत्तक घेण्याचे प्रमाण आहे. कोरोना महामारीने आता समाजातील प्रत्येक कुटुंबाने दत्तक घेण्याचे अभियान राबवण्याची गरज आहे. जेणे करून काही वर्षात समाज अनाथालय मुक्त होईल. ज्यांना कमी biological मुले हवीत त्यांनी जरूर कमी मुले जन्माला घालावीत पण त्यासोबत काही अनाथ मुले दत्तक घ्यावीत. असा सल्ला देणे सोपे आहे पण प्रत्यक्षात उतरवायला अतिशय कठीण आहे ह्याची जाणीव पण आहे. पण कुठून तरी सुरवात व्हायला हवी. कोरोनाच्या संकटात समाजाने हा नवा बदल घ्यायला हरकत नाही.

चीनचा कोरोना प्रकल्प म्हणजे biological warfare चा prototype म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे कोरोना पेक्षा भयंकर महामारी भविष्यात येणार नाही असे कोणी ठामपणे सांगु शकत नाही. त्यामुळे समाजाने एक अपत्य कुटुंब पद्धतीचा त्याग आणि दत्तक पद्धतीचा अवलंब ह्यावर गंभीर चर्चा, चिंतन करण्याची गरज आहे. म्हणून पुरातन आशिर्वाद ‘अष्ट’ नाहीतर ‘त्रि पुत्र सौभाग्यवती भव’ असा आशिर्वाद नव्याने रुजू करण्याची गरज आहे.

 

सतीश गुंडावार

१० एप्रिल २०२१