Sunday 19 April 2020

हेमंत कुमार

एखादी शास्वत गोष्ट समजायला किंवा आवडायला एक प्रगल्भता लागते. ती कोणाला लवकर तर माझ्यासारख्यांना जरा उशिराच येते. असेच काहीतरी माझे हेमंतदा बद्दल झाले. इतकी वर्षे त्यांची गाणी ऐकत आलो पण त्यांची गायकी आणि संगीत समजायला जरा उशीरच झाला. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात एक व्यक्ती महान गायक आणि तितक्याच ताकतीचे संगीतकार आहे तसे थोडेच लोक. पण दोन्ही प्रवास करणारे हेंमतदा हे त्यात सर्वश्रेष्ठ म्हटले पाहिजे. मी जेव्हा हेंमतदा वर लिहायचे ठरवले तेव्हा त्यांनी गायलेली काही गाणी डोळ्यासमोर होती. पण जेव्हा थोडा शोध सुरु केला तर मी पहिले गोंधळलो की हेंमतदाच्या गायकीवर लिहायचे की संगीतकारवर लिहायचे? हेमंतदा उत्कृष्ट गायक की उत्कृष्ट संगीतकार असा माझा गोंधळ उडाला. एका पत्रकाराने हा प्रश्न त्यांच्या मुलांना विचारला. ते पण गोंधळले पण त्यांनी गायक असे उत्तर दिले. हेंमतदा जेव्हा गेलेत तेव्हा सत्यजीत रे म्हणाले की आज दुसऱ्यांदा रवींद्र संगीताचा मृत्यु झाला. महान संगीतकार सलिलदा म्हणत की देवांचा आवाज हा हेंमतदा सारखा असणार. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर मी देणे म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखे होईल. माझा गोंधळ कमी करण्यासाठी मी ठरवले की हेंमतदाची ही दोन रूपे स्वतंत्रपणे मांडावीत म्हणून हेंमतदा वर दोन लेख लिहायचे ठरवलेहा लेख हेमंतदांचा संगीतकार म्हणून काय योगदान ह्यावर असेल.

हेमन गुप्ता ह्या त्यांच्या निर्देशक मित्राने त्यांना १९५२ मध्ये मुंबईला आणले आणि त्यांना आनंदमठ’ हा चित्रपट दिला. पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे हेमंतदा ह्यांनी ह्या चित्रपटात लतादिदी कडून 'वंदे मातरम' (https://youtu.be/oi1h7JNncOA ) गावून घेतले. हे गाणे बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या चालीत गायले आहे पण आजही जनमाणसावर हेमंतदानी दिलेली चाल कोरली आहे. हेमंतदानी लतादिदीकडून काही चिरस्मरणीय गाणी गावून घेतलीत. त्यात 'कही दीप जले कही दिल', (https://youtu.be/nLDGwmJl9zI ) 'मेरा दिल ये पुकारे आजा', (https://youtu.be/mr_n9R3E_w4 ) 'हमने देखी है उन आंखोकी मेहकती खुशबू', (https://youtu.be/doPtBhDTpj0 ) 'छुप गया कोई रे दूर से पुकारके', (https://youtu.be/9tlOaMQrhI8 )  'धीरे धीरे मचल हे दिल बेकरार', (https://youtu.be/e3RiMIAZ1vY ) 'कुछ दिल ने कहा कुछ भी नही', (https://youtu.be/69dnqIFfrnE ) ' बेकरार दिल',  'झूम झूम ढलती रात', (https://youtu.be/eArec8UyNh0) 'सपने सुहाने लडकपन के', (https://youtu.be/l8mvptaIwXE ) अशी अवीट गाणी हेमंतदानी लतादिदीकडून करून घेतली. हेमंतदांनी १९५४ मध्ये 'नागिन' ह्या चित्रपटाला संगीत दिले. ह्या चित्रपटात 'मन डोले मेरा तन डोले'  (https://youtu.be/cvOD8GZ7reo ) ह्या गाण्यात त्यांनी बीन वाजवली आहे ती आजही लोकप्रिय आहे. आज समाजात नाग आणि ही बीन एक समीकरण झाले आहे.

हेमंतदा स्वतः उत्कृष्ट गायक असून सुद्धा गाण्या अनुरूप गायकांकडून गाणी गावून घेतली. कवी प्रदीप वर जेव्हा मागे लिहले होते तेव्हा जागृती’ ह्या चित्रपटाबद्दल लिहले होते त्या चित्रपटाचे संगीत हेमंतदानी दिले आहे. कवी प्रदीपने स्वतः गायलेले गाणे 'आवो बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्तानकी', (https://youtu.be/XiiBsKU4z6c ) आणि रफींनी गायलेले 'हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के’, ही गाणी देशभक्ती गीत म्हणून आपण आजही ऐकतो. रफींनी सुद्धा हेमंतदा बरोबर खूप गाणी गायली त्यात ' रात के मुसाफीर चंदा जरा बता दे', (https://youtu.be/rUAEFAXcVFg ) 'बृन्दावन का कृष्ण कन्हैय्या सबकी आंखोका तारा' ही विशेष लोकप्रिय आहेत.

हेमंतदानी गीता दत्त, आशाताई, किशोरकुमार, मन्ना डे आणि अनेक गायकांकडून गाणी गावून घेतलीत. गीता दत्त ह्याची काही उल्लेखनीय गाणी 'साहिब, बीबी और गुलाम' ह्या चित्रपटातील 'पिया ऐसो जीयामें समाए गयो रे', (https://youtu.be/tUn8NNFKXQs ) आणि 'ना जाओ सैय्या छूडाके बैय्या कसम तुम्हारी मैं रो पडुंगी'. (https://youtu.be/TCDbIT13MRY ) त्याच चित्रपटातील आशाताई ह्यांचे 'साकीया आज मुझे निंद नही आयेगी' (https://youtu.be/RIRVQ4vJrY4 ) अप्रतिम आहे. गीता दत्त ह्याचे हेमंतदा बरोबर गायलेली ' ये चांद होगा तारे रहेंगे' (https://youtu.be/AfpMM6O1qsc ) आणि 'गुमसुम सा ये जहाँ ये रात ये हवा'  (https://youtu.be/pDjNi8NkrPA ) ही गाणी अप्रतिम आहे. त्यांनी किशोरकुमार कडून खामोशी’ ह्या चित्रपटात ' शाम कुछ अजीब थी ये शाम' (https://youtu.be/MDXFi3avqo0 ) हे गाणे गावून घेतले. तसेच किशोरकुमारचे हे 'हवा पे लिख दु हवा के नाम' गाणे आपण ऐकले आहे.

हेमंतदा चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. गायक आणि संगीतकारा बरोबर त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती पण केली. 'बीस साल बाद', 'कोहरा', 'बीवी और मकान', 'खामोशी' ह्यांचे विशेष नाव घ्यावे लागेल. ह्या चित्रपटाचे संगीत हेमंतदाचे असणारच. हेमंतदांनी बरीच गाणी कैफी आझमी ह्यांच्या कडून लिहून घेतली. चोखंदळ वाचक ते का हे लगेच समजू शकतील. हेमंतदांनी इतर गीतकारांकडून पण गाणी लिहून घेतली पण हेमंतदा आणि कैफी आझमी ह्या दोघांनी अफलातून गाणी हिंदी चित्रपट सृष्टीला दिली आहेत. त्यांच्या संगीतावर रवींद्र संगीताचा पगडा दिसतो. शास्त्रीय संगीतावर बरीच गाणी हेमंतदानी केलीत. त्यांचे संगीत साधे, सरळ आणि शांत त्यात वाद्यांचा गोंगाट नाही. कमीतकमी वाद्यांचा वापर ते करत. गाण्यात एक ठेहराव असायचा. पाश्चात्य वाद्यांचा वापर पण केला पण ते fusion कडे ते वळले नाही. ही सर्व गाणी आवर्जून ऐका. मला खात्री आहे की शास्वत संगीत ऐकल्याची अनुभूती तुम्हाला येईल. तुम्हाला ही गाणी कशी वाटली हे जरूर मला कळवा.  ह्या लेखात तुमच्या लक्षात आले असेल की हेमंतदानी गायलेली गाणी मी दिली नाहीत कारण हेमंतदांच्या गायकीवर एक स्वतंत्र लेख येत आहे.  (क्रमश)

सतीश गुंडावार

१९-एप्रिल-२०२०

12 comments:

  1. खूप छान.. अलौकीक व स्वर्गीय असेच त्यांचे वर्णन करावे लागते...
    डॉ. आनंद फाटक

    ReplyDelete
  2. तुझ्या ब्लॉगमुळे नेहमीच गीत संगीताच्या आनंददायक दुनियेची सफर होते.

    ReplyDelete
  3. Very good info keep writing dear....

    ReplyDelete
  4. Highly impressed with ur music knowledge and keen to let people know about few legendsof indian music industry
    Keep writing

    ReplyDelete
  5. Satish bhauji

    Your writups are always well researched and highly informative.
    Thanks for enlightening us on greats of our music industry.
    Wouldn't have known all this facts but for your article-----
    Keep writing!
    Dr Ravi Alurwar

    ReplyDelete
  6. सर्वप्रथम ह्या संकल्पनेबद्दल अभिनंदन.
    भारतीय सांगितीक खजिन्याचा विपुल साठा आहे.
    पण आमच्या सारख्या सामान्य माणसाला तितकं कळत नाही आणि व्यक्त ही करता येत नाही.
    ह्या लेखमाला सहज सोपे करून सांगतात आणि
    त्यातील आनंद व आस्वाद घेऊन छान वाटतं.
    नेहमीच प्रतिक्षेत ...

    ReplyDelete
  7. It's good one Satish. Hemant kumar was one of gems for melodies voice.

    ReplyDelete