Wednesday, 11 March 2020

कवी प्रदीप

'ए मेरे वतन के लोगो' हे गाणे न ऐकलेला एकही भारतीय नसेल. हे गाणे कवी प्रदीप ह्यांचे आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या गांधी जयंतीला जी देशभक्ती गीते आपण ऐकतो त्यातली बरीच गाणी ही कवी प्रदीपने लिहिली असतात. हिंदी चित्रपट सृष्टीच्या मायानगरीत आपले सत्व, तत्व आणि साधेपणा टिकवणारे तसे फारच कमी. कवी प्रदीप त्यापैकीच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आणि गांधीवादी विचाराचे. रामचंद्र नारायण द्विवेदी म्हणजेच कवी प्रदीप. १९३९ साली कवी संमेलनासाठी मुंबईला आले आणि तिथेच हिंदी चित्रपटासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचाच व्यक्तिमत्वासारखे त्यांची गाणी सोपी आणि सरळ भाषेत जी सामान्य माणसाला लगेच कळेल अशी आहेत. हिमांशू रॉय ह्या महान चित्रपट निर्मात्याने ह्या हिऱ्याला शोधून काढले. १९३९ साली कंगन ह्या चित्रपट पासून सुरुवात झाली आणि ती वाढतच गेली.

कवी प्रदीपांनी सगळ्या प्रकारची चित्रपट गीते लिहिली पण त्यांच्या देशभक्ती, सामाजिक आणि धार्मिक गीतांनी हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द केली. त्यांच्या पहिल्या देशभक्ती गीताने तर खूप खळबळ माजवली. १९४३ साली आलेल्या किस्मत चित्रपटातील 'दूर हटो ए दुनियावालो ये हिंदुस्थान हमारा है' हे गाणे साऱ्या देशाने डोक्यावर घेतले. चित्रपट गृहात once more वर once more व्हायचे. चित्रपटगृह चालकाला चित्रपट थांबवून रीळ परत गुंडाळून अजून हे गाणे लावावे लागे. १९४२ च्या चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे गाणे ऐका. ब्रिटिश सरकारने चित्रपटाला परवानगी तर दिली पण हे गाणे सत्याग्रहाचे प्रतीक बनेल हे त्यांना लक्षात आले नाही. ब्रिटिशांनी नंतर ह्या गाण्यावर बंदी घातली आणि कवी प्रदीप ह्यांच्या अटकेचा आदेश काढला.

त्यानंतर महत्वाचा पडाव म्हणजे १९५४ साली आलेला जागृती हा चित्रपट. चित्रपट तसा साधा आणि शाळेवर आधारित कथा पण कवी प्रदीपांनी आपल्या गीतांनी त्या चित्रपटाचे सोने केले. 'आवो बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्तानकी', 'हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के, ' दे दी हमे आझादी बीना खडग बीना ढाल, साबरमतीके संत तुने कर दिया कमाल'. ही गाणी इतकी गाजली की पाकिस्तान मध्ये त्याच काळात बेदारी नावाचा चित्रपट आला. त्या चित्रपटात ही गाणी थोडे शब्द बदलून चाली सकट वापरली आहेत.

देशभक्ती गीताचा कळस म्हणजे ''ए मेरे वतन के लोगो' हे गीत. १९६२ च्या चीनच्या युद्धात पराभवानंतर देशबांधवांचे मनोबल उंचावण्यासाठी हे गीत लिहले. १९६३ च्या प्रजासत्ताक दिना निमित्य हिंदी चित्रपट सुष्टीतील महान कलाकारांनी एक कार्यक्रम ठरवला होता. त्या कार्यक्रमात आधीच प्रदर्शित झालेली गाणी होती. हे असे एकच गाणे होते की ते पहिल्यांदा गायले गेले होते. आपण सर्वांना माहीत आहे की हे गाणे ऐकून पं. नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले. लतादिदी म्हणतात की त्यानंतर जेवढे stage shows त्यांनी केलेत त्यात हे गाणे त्यांना गायलाच लागायचे. असा प्रभाव सामान्य जनमाणसावर ह्या गाण्याने केला. कवी प्रदीप ह्यांनी हे गाणे कोणत्याही चित्रपटात वापरू दिले नाही आणि आणि ह्या गाण्याचे संपुर्ण मानधन सैनिकांच्या विधवांच्या संस्थेला दिले.

समाजाचे मनोबल उंचावे, तरुणांना प्रेरणा मिळावे म्हणून कवी प्रदीपनी खूप गाणी लिहिलीत. 'चल चल रे नौजवान', 'इन्साफ कि डगर पे’, 'चल अकेला चल अकेला, तेरा मेला छुटा.. ', 'उपर गगन विशाल' ही गाणी आपण ऐकली आहेत. कवी प्रदिपांनी समाजाला आरसा दाखवायला वडीलकीच्या नात्याने बरीच गाणी लिहली. 'देख तेरे संसार कि हालत क्या हो गयी भगवान कितना बदल गया इंसान', 'इन्सान का इन्सान से हो भाईचारा', ‘कभी धूप कभी छाव', 'अंधेरे मे जो बैठे है, नजर उन पर भी कुछ डालो' आणि बरीच अशी गाणी.

देशभक्ती आणि समाज प्रबोधनाच्या गाण्या सोबत कवी प्रदीप ह्यांनी बरीच धार्मिक गाणी लिहिली. १९७५ साली 'जय संतोषी माँ' हा चित्रपट 'शोले' च्या सोबत प्रदर्शित झाला होता. ह्या चित्रपटाने शोले इतकाच व्यवसाय केला. ह्यातील गाणी खूप प्रसिद्ध झालीत. 'मै तो आरती उतारू रे संतोषी माता की', 'करती हूं तुम्हारा व्रत मै' ही गाणी गावोगावी वाजलीत. अशी जादू कवी प्रदीप ह्यांच्या गाण्याची होती. बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की कवी प्रदीप ह्यांनी फक्त देशभक्ती आणि धार्मिक गाणी लिहिली. त्यांनी बरीच प्रेम गीते आणि चित्रपटाला लागणारी इतर गाणी पण लिहिलीत. 'ना जाने कहा तुम थे' हे सुंदर गाणे कवी प्रदीप ह्यांचेच.

कवी प्रदीप हे सुरेख गायक पण होते. 'देख तेरे संसार कि हालत क्या हो गयी भगवान', 'कभी धूप कभी छाव', आणि बरीच गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांची एक ख्याती होती. गाणे लिहून आणले की त्याची चाल पण सांगायचे. कित्येक संगीतकार त्यांना चाल विचारायचे आणि त्याच चालीवर संगीत द्यायचे.

देशभर शाहीनबाग सारखे आंदोलन बघितले की १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तलाक चित्रपटात त्यांनी लिहिलेले 'कहनी है एक बात हमे इस देश के पहरेदारोसे, संभल के रहना अपने घर में छिपे हुए गद्दारों से' हे गाणे आठवते. देशार्गंत शत्रू देश तोडायचे कसे काम करत आहे ते त्यांनी १९५८ सालीच लिहून ठेवले आहे. शाहीनबाग, anti CAA प्रदर्शन आणि त्या नंतर जागोजागी होणाऱ्या हिंसाचाराचे समर्पक प्रतिबिंब ह्या गाण्यात आहे. आवर्जुन हे गाणे संपूर्ण ऐका.

लोक त्यांना महाकवी, बापू, पंडितजी ह्या नावाने बोलावयाचे. त्यांचे अजून एक टोपणनाव होते जे माझे पण आहे. त्याचा मला आनंद आहे. त्यांनी काही गाणी Miss कमल B.A. ह्या नावाने लिहिलीत. भारत सरकारने त्यांना १९९७ साली दादा साहेब फाळके पुरस्काराने त्यांच्या कामाचा योग्य गौरव केला. हा blog लिहताना ही सर्व गाणी अजून ऐकली. प्रत्येक गाण्याने डोळे ओलावले. माझी खात्री आहे तुम्ही पण तसाच अनुभव घ्याल.

 

सतीश गुंडावार

१० मार्च २०२०

Friday, 21 February 2020

श्रीकांत ठाकरे

होय ठाकरेच! आज अश्याच एका अवलिया मराठी संगीतकारावर लिहायचा मूड झालाय. ठाकरे म्हटले की शिवसेना आणि बाळासाहेब डोळ्यासमोर येतात. होय त्याच पैकी म्हणजे बाळासाहेबांचे धाकटे बंधु आणि मनसेचे राज ठाकरे ह्यांचे वडील म्हणजे श्रीकांत ठाकरे! प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या साहित्य, कला आणि संगीत ह्याचा सुंदर वारसा पुढे नेणारे श्रीकांतजी. रेडिओवर कधी मोहम्मद रफ़ी किंवा शोभा गुर्टु ह्यांचे मराठी गाणे लागले तर हे गाणे श्रीकांत ठाकरेंचे असावे असा पहिला अंदाज बांधावा. त्यात रफींचे असेल तर संगीत श्रीकांत ठाकरेंचेच असणार.

रफ़ीना मराठीत गावुन घेण्याचे पूर्ण श्रेय श्रीकांत ठाकरेंना जाते. पण त्यांचे मोठेपण ह्यातच नाही. अभिजात मराठी गाण्यात उत्तर भारतीय संगीत थाट, उर्दू आणि हिंदी शब्दांचा मुक्तपणे वापर, ठुमरी, कव्वाली आणि गझल ह्याचा उत्तम वापर करण्याचे पुर्ण श्रेय त्यांना जाते. मराठी गाण्याच्या सुवर्णकाळात त्यांची गाणी संपुर्ण वेगळी आणि अद्वितीय आहेत. गाण्यातील वाद्यसंच सुद्धा आगळावेगळा आहे. त्यांनी सतार, सारंगी, व्हायोलिन, मेंडोलिन, बुलबुलतरंग अश्या तंतु वाद्यांचा विलक्षण मेळ घातला. त्यांनी रफींकडून भावगीते, भक्तीगीते, मराठी गझल, कोळीगीते गावुन घेतलीत. 'शोधिशी मानवा राऊळी मंदिरी', 'प्रभु तू दयाळु', 'खेळ तुझा न्यारा' ही भक्तीगीते आपल्या ओठावर आहेत. रफींनी अवीट भावगीते मराठीत श्रीकांतजींकडे गायली आहेत. 'हे मना आज कोणी' अतिशय अप्रतिम आहे. श्रीकांतजींने रफींकडून प्रेमगीते कव्वाली थाटात गावुन घेतली आहेत. 'हा रुसवा सोड सखे', 'हा छंद जीवाला लागे पिसे' ही गाणी नक्की ऐका. गाण्यात उर्दू आणि हिंदी शब्दांचा मुक्त वापर केला आहे. रफी पंजाबी असून सुद्धा त्यांच्याकडून '', '', '', '', '', '', '' ह्या अक्षरांचा उच्चार अगदी अस्सल मराठी माणसासारखा काढून घेतला. असे ऐकले की रफींना मराठी '' स्पष्ट उच्चारता येत नव्हतं म्हणुन श्रीकांतजींनी आपल्या गीतकारांना '' वापरण्याचा सल्ला दिला होता. रफींनी गायलेली मराठी गझल 'विरले गीत कसे' हे जरूर ऐका. 'अग पोरी संबाल दर्या...' हे कोळीगीत सर्वांचे आवडीचे आहेच आणि हे बालगीत 'प्रकाशातील तारे तुम्ही ..... हसा मुलांनो हसा' आपण कित्येकदा ऐकले असणार. रफींनी मोजकेच मराठी गाणी गायली. परंतु मला खात्री आहे की श्रीकांतजींने केलेल्या गाण्यांनी त्यांना अत्यंत समाधान दिले असणार. 
श्रीकांतजींनी खूप साऱ्या गायकांकडून गावुन घेतले. शोभा गुर्टू आणि दिलराज कौर ह्यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अश्या गायिकेंचा वापर मराठी गाण्यात फक्त श्रीकांतजी सारखे श्रेष्ठ संगीतकार करू शकतात. शोभा गुर्टू ह्यांचीमाझिया प्रियाला प्रीत कळे ना', 'उधड्या पुन्हा जहाल्या' ह्या ठुमरी थाटातील गाणे आपण खूपदा ऐकली आहे. त्यांची 'अधीर याद तुझी जाळीतसे', 'त्यांनीच छेडले गं' ही गाणी पण अप्रतिम आहेतमला विशेष उल्लेख दिलराज कौर ह्यांची 'सांग ना कुठे जाऊ', आणि 'भेट ती तुझी झाली' ह्या गाण्यांचा करावासा वाटतो. संगीत प्रेमींना जरूर आवडतील अशी सुंदर. 

मराठी गाण्यांच्या अमुल्य साठ्यात श्रीकांत ठाकरेंचे एक वेगळे योगदान आहे. त्यांनी केलेली गाणी त्यावेळी सुद्धा अद्वितीय होती आज पण आहेत. त्यांच्या संगीत थाटणीची पद्धत त्यावेळी पण क्रांतिकारक होती. ठाकरे घराण्याचे आगळेवेगळे पण त्यांच्या संगीतातपण दिसून येते. श्रीकांतजी उत्तम संगीतकार असतांना श्रेष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार पण होते. धाकट्या भावाचे आदर्श उदाहरण म्हणायला काहीच हरकत नाही. बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीत आणि पत्रकारितेत श्रीकांतजींचा पडद्या मागुन सिंहाचा वाटा होता. पण मला असे वाटते की संगीत त्यांचे पहिले प्रेम असावे म्हणून पत्नीचे नाव मधुवंती, मुलीचे नाव जयजयवंती तर मुलाचे नाव स्वरराज (म्हणजेच राज) असे ठेवले. श्रीकांतजी मराठी संगीतातले एक दीपस्तंभ आहेत आणि येणारी पिढी जेव्हा मराठी सुगम संगीताचा अभ्यास करतील तेव्हा त्यांना श्रीकांतजी नक्कीच एक नवीन दृष्टी देतील.

हा ब्लॉग जर समजा राज ठाकरे पर्यंत पोहचला तर माझी त्यांना एक आग्रहाची विनंती असेल की त्यांनी श्रीकांतजींना समर्पित एक संकेतस्थळ तयार करावे आणि त्यात श्रीकांतजींने जो खजिना सोडून गेलेत तो त्यात टाकावा. येणाऱ्या पिढीला त्यातुन खूप प्रेरणा मिळेल.

सतीश गुंडावार
२१-फेब्रु-२०२०

Monday, 6 January 2020

Citizenship Act of India

Citizenship by birth in India,
·        Indian constitution came into force on 26-Jan-1950. It says whosoever reside in territory of India as on 26-Nov-1949 are citizen of India. It means everyone including British or any foreign national or people migrated from Pakistan after partition are citizen of India.
·        Whosoever born in India is a citizen of India irrespective of nationality of his/her parents. 
·       Citizenship by birth changed to Citizenship by descent (partially) on 1-July-1987. One of the parent has to be citizen of India at the time of birth. This act was amended to accommodate Assam Accord in 1986.
·       The law was further changed in 2003 amendment. Now both the parents have to be Indian citizen the time of birth as on 3-Dec-2004. However, 1986 amendment was still acceptable but other parent can’t be illegal immigrant. Thus the citizenship is now by descent only.
Person born outside of India
·         Person born to Indian father after 26-Jan-1950 could get Indian citizenship.
·         This was changed to Indian parents (both mother and father) on or after 10-Dec-1992

How foreigner (not illegal immigrant) can get Indian Citizenship:
·         Person of Indian origin resides in India for 7 years
·         Person of Indian origin lives in any other countries than territory of undivided India
·         Person marries to Indian citizen and lives in India for 7 years
·         Person has OCI card for last 5 years and resides in India for last one year.
·         Any other foreigner who resides in India for 12 years.  
Bombay high court gave a judgement in 2013 that birth certificate, passport, or aadhar card are not sufficient to prove one’s citizenship. Citizenship Act amendment act in 2003 also mandated govt to construct National Register of Citizen which is not yet implemented.

6-Jan-20

Friday, 27 December 2019

Saxophone अर्थात नागांग


मला भारतीय असण्याचा अभिमान असण्याचे एक कारण आहे की आपण कोणत्याही गोष्टीचे लगेच भारतीयकरण करतो. संगीत, कला, संस्कृती, खानपान किंवा पेहराव ह्यांचे भारतीयकरण झालेले आपण नेहमी बघतो. हे कदाचित आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट असेल. अश्याच एका भारतीयकरणाची एक गोष्ट आज सांगतो. अगदी लहानपनापासून मला एका वाद्यांचे आकर्षण राहिले ते म्हणजे Saxophone  अर्थात नागांग. त्याचा विशिष्ट आकार आणि त्यावरील आकर्षक बटना मुळे हे वाद्य आकर्षित करतेच पण त्याचा आवाज पण फार मोहक आहे.

हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात असा संगीतकार सापडणे कठीण की ज्यांनी हे वाद्य वापरले नसेलपाश्चात्य देशात Rock आणि Jazz मध्ये मुख्यत्त्वे वापरले जाणारे हे वाद्य भारतीय संगीतकारांनी आणि वादकांनी सर्व प्रकारच्या रसात ह्या वाद्याचा वापर सर्जनशीलतापुर्वक केला. गाण्याचा रस कोणताही असो romantic, sad, club songs, किंवा rock and roll ह्या सर्व गाण्याचा mood ह्या वाद्याने रंगवला. ते मिनिटांच्या गाण्यात १० ते २० सेकंद वेळ ह्या वादकांना मिळाला असेल पण त्या वेळात पण ह्या कलाकारांनी त्यांची सर्जनशीलता दाखवली आहे. Saxophone चा वापर केलेल्या गाण्याची संख्या एवढी आहे की त्यातुन काही गाणे सांगणे म्हणजे समुद्रात मोती शोधण्यासारखे आहे.

Club मधील गाण्यात हे वाद्य पडद्यावर पण आले. LP चे 'मैं आया हुं लेके साज(https://youtu.be/RRzITO8hsw8). हिरोच्या हातातले वाद्य म्हणून Saxophone ने लवकरच नाव केले. ह्या गाण्यात prelude आणि interlude खूप Saxophone वापरले आहे. Saxophone आणि trumpet ची चांगली जुगलबंदी ह्या गाण्यात आहे. Muted trumpet चा अप्रतिम उपयोग ह्या गाण्यात ऐकायला मिळतो. पी नय्यर चे “हुजुरेवाला जो हो इजाजत” (https://youtu.be/-6ym4uOOtEo) हे गाणे तसे भारतीय थाटाचे पण Saxophone चा वापर prelude मध्ये अप्रतिम आहे. भारतीय थाटाचे गाणे club मध्ये असा विचार फक्त पी नय्यरच करू शकतात.  RD ने तर हे वाद्य फार वापरले आहे. 'तिसरी मंझिल' सर्वांनीच बघितला आहे. त्यातील ' हसिना झुल्फोवाली'  (https://youtu.be/uaTyirMKOBw ) मध्ये Saxophone ऐकण्यासारखा आहे. ह्या गाण्यात शम्मीकपूरच्या हातात Saxophone, Trumpet आणि Trombone हे तीनही brass वाद्य आहेत.  तसेच कारवा मधील 'पिया तू अब तो आजा' (https://youtu.be/dX-gSSLmxUU) मध्ये trumpet सोबत Saxophone आहे.

दर्दभरे गाण्यात किंवा विरह गाण्यात सुद्धा ह्या वाद्याने तो भाव जागृत करण्यात मदत केली. ही कमाल कदाचित भारतीय संगीतकारांचीच. सलिलदांचे 'जा रे उड जा पंछी' (https://youtu.be/YTMxRVtgLy4) , पी नय्यर चे 'हैं दुनिया उसीकी जमाना उसीका' (https://youtu.be/i85EpitOIkM). प्रत्येक interlude मध्ये Saxophone चा अप्रतिम वापर आहे. कल्याणजी आनंदजी चे 'तुम्हे याद होगा' (https://youtu.be/fvEIULDxSgI). हे गाणे तर Milestone गाणे आहे. ते पुढे सांगेन. शंकर जयकिशनचे 'बेदर्दी बालमा तुझको मेरा मन' (https://youtu.be/qixsOfJccUo) ह्या सर्व गाण्यांची उंची ह्या वाद्याने वाढवली.

Romantic गाण्यात तर हे वाद्य मुक्तपणे वापरले आहे. 'रुप तेरा मस्ताना' (आराधना) (https://youtu.be/HenA-OUyo0s), 'गाता रहे मेरा दिल' (गाईड) (https://youtu.be/7J1nr0-2O60), 'जा ने दो ना' (सागर) (https://youtu.be/6AWm00bSHiM), 'माना हो तुम बेहद हसीन' (https://youtu.be/Pu3c5WntSgo), 'मेरा प्यार भी तू हें’ (साथी) (https://youtu.be/iXprkd-pA_M),  ' ओ हंसिनी कहाँ उड़ चली' (https://youtu.be/R4Vj_XsfHTM). ह्या सर्व गाण्याच्या Romantic mood ला ह्या वाद्याची झालर आहे. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त काही गाणी आठवत असेल तर मला जरूर सांगा.

हिंदी गाण्यात Saxophone ऐकले की आठवण येते ती मनोहरी सिंग ह्यांची. सचिनदेव बर्मन, सलिलदा आणि राहुलदेव बर्मन ह्यांच्या गाण्यात Saxophone ऐकले की समजायचे की ते मनोहरी सिंग ह्यांनी वाजविले असणार. मनोहरी सिंग हे नेपाळी वंशाचे वादक कलकत्ता मध्ये प्रसिद्ध होते. ते पुढे १९५८ मध्ये मुंबईला आले आणि हिंदी चित्रपट संगीतात हे प्रमुख वाद्य झालेमनोहरी सिंग ह्यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील Saxophone चे एक अनभिन्य सम्राट म्हणायला पाहिजे. 'तुम्हे याद होगा' ह्या गाण्यात १९५९ मध्ये solo saxophone त्यांनी वाजवला आणि ह्या वाद्याचा हिंदी गाण्यातला काळ सुरु झाला. स्वातंत्र्यापूर्वी अनिल बिस्वास ह्यांच्या वाद्यवृंदात रामसिंग म्हणून एक उत्कृष्ट Saxophone वादक होते. पण मधे मोठा काळ हे वाद्य मागे पडले ते मनोहरी सिंगनी अजुन पुढे आणले. त्यांना समकालीन राज सोढा, श्याम राज, आणि आपला मराठमोळा सुरेश यादव ह्या वादकांनी Saxophone अप्रतिम वापर हिंदी चित्रपटाच्या गाण्यात केला. अगदी आपल्या मराठी गाण्यात पण Saxophone खूप वापरला आहे. पं. हृदयनाथांनी संपेल ना कधी ही, हा खेळ सावल्यांचा’ (https://youtu.be/hQDPV8bVv9c) आणि श्रीनिवास खळेंनी ‘सावलीस का कळे’ (https://youtu.be/o3O-ip3IgZc) मध्ये अप्रतिम वापरले आहे.

हे वाद्य भारतात कसे आले ह्याचा इतिहास रोचक आहे. हे वाद्य अली बेन सौ एले ह्या फ्रेंच वादकाने भारतात आणले. हे वाद्य तसे आधुनिकच. ऍडॉल्फ सॅक्स (Adolphe Sax) नावाच्या बेल्जियन संगीतकाराने त्याची निर्मिती साधारण १८४० च्या सुमारास केली. म्हणून ह्याला Saxophone असे म्हणतात. अली बेन १८५१ ते १८५८ पर्यंत म्हैसूरच्या राजाच्या पाश्चिमात्य वाद्यवृंदाचा director होता. म्हणजे हे वाद्य निर्माण झाल्याच्या १० वर्षाच्या आत हे वाद्य भारतात आले. असे मानतात की अली बेनने काही भारतीय वादकांना हे वाद्य शिकवले. म्हैसूरच्या राजाच्या वाद्यवृंदात हे वाद्य तेव्हा पासून आहे.

ऍडॉल्फ सॅक्सने सर्वच म्हणजे ही प्रकारच्या Saxophone निर्मिती केली आणि पेटंट पण मिळवले. हीच प्रकार आजही थोड्या फार बदलाने जगात दिसतात. स्वतः ऍडॉल्फ सॅक्सने ह्या वाद्याचा बराच प्रसार केला. हे वाद्य लगेच लोकप्रिय झाले आणि युरोपात मिलिटरी बँड आणि Orchestra मध्ये वापरायला लागले. पण हे वाद्य १८९० सुमारास युरोपातून लुप्त झाले किंवा वापर कमी झाला. पुढे १९१० नंतर हे वाद्य अमेरिकन वादकांनी अजुन Jazz Band मध्ये वापरायला सुरुवात केली आणि ह्या वाद्याचा जगभर प्रसार सुरु झाला.

आपल्या भारतात प्रकारचे Saxophone प्रामुख्याने दिसतात. Soprano, Alto आणि Tenor. ह्या तीन प्रकारच्या वाद्याच्या आवाजात काय फरक आहे हे कळायला अजून माझे कान परिपक्व झाले नाही. Kenny G. हा प्रसिद्ध वादक Soprano वाजवतो. बऱ्याच Restaurant मध्ये संध्याकाळी मंद आवाजात Kenny G च्या Soprano Saxophone वरील धून तुम्ही ऐकल्या असतील.

दक्षिणेत ह्या वाद्याचा कर्नाटकी संगीतात आत्मसात करण्याचे प्रयत्न झाले. नुकतेच निधन पावलेले कादरी गोपालनाथ कर्नाटकी संगीतात Saxophone वाजवणारे प्रसिद्ध आहेत. त्यांनी कर्नाटकी संगीत saxophone वर जगभर नेले. त्यांना सुद्धा म्हैसूरच्या राजाच्या वाद्यवृंदातील एका वादकाने Saxophone शिकवले.

रा. स्व. संघाच्या घोषात शृंग दलाची सुरुवात पुण्यात साधारण १९५० च्या सुमारास झाली. Saxophone शृंग दलातील एक महत्वाचे वाद्य. आज शृंग दल भारतभर विस्तारले आहे. संरक्षण क्षेत्र सोडून नागरी क्षेत्रात प्रांगणीय संगीतात संघाजवळ सर्वात जास्त वादक असतील. कदाचित रा. स्व. संघाजवळ सर्वात जास्त Saxophone वादक असतील. एक घोष वादक म्हणून मला ह्या वाद्याचे नेहमीच कुतुहल राहले आहे.  

सतीश गुंडावार

२९-नोव्हेंबर २०१९