Friday 21 October 2022

कांतारा - द लेजेंड

गेल्या दोन वर्षांत कोरोना सुरू झाल्यापासून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे फार क्वचितच. विद्यार्थीदशेत असताना चित्रपटाचे नाव माहीत नाही, सिनेमा सुरू होऊन ५ मिनिटे झालेत तरी आमच्या चित्रपट वेड्या मित्रामुळे सिनेमा बघायला गेल्याच्या बऱ्याच आठवणी आहेत. अगदी सिनेमाचे नाव मध्यांतरात कळले असेही व्हायचे. असेच काहीतरी झाले. कांतारा ह्या चित्रपटाचे नाव word of mouth ने काल कळाले. चित्रपट दक्षिण भारतीय आहे ह्या व्यतिरिक्त चित्रपटाबद्दल शुन्य कल्पना. अगदी रात्री पाऊणे दहाला तिकीट बुक केले आणि रात्री १० वाजताचा आम्ही खेळ बघायला गेलो.

चित्रपटाची कथा उडुपी, मंगलोर आणि उत्तर केरळातील तूलुनाडू भागावर आधारित आहे, दंतकथा किंवा लोककथा असावी. त्या भागातील दैव नर्तक ह्या लोककलेवर हा चित्रपट आधारित आहे. एक फार पराक्रमी आणि लोकप्रिय राजा असतो. पण त्याला जीवनात शांती नसते. एक दिवस तो जीवनात शांती शोधण्यासाठी जंगलात येतो. जंगलातील वनवासी लोकांच्या दगडाच्या देवासमोर तो येतो. चमत्कार घडावा असे त्याची तलवार खाली गळून पडते आणि त्याला शांती लाभते. तो वनवासी लोकांना त्यांचा देव मागतो. ती लोक राजाला त्याच्या बदल्यात ते जंगल मागतात. पण राजाला बजावून सांगतात की भविष्यात तूझ्या वारसदारांनी जर ही जमीन परत मागितली तर अनर्थ होईल.

पुढे आधुनिक काळात राजाचे वंशज आणि सरकारी वन विभाग ते जंगल ह्या वनवासी लोकांकडून कसे बळकावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातला संघर्ष ही चित्रपटाची कथा!

इतकी साधी कथा असतांना सुद्धा प्रेक्षक खिळून बसतो. आपल्या सारख्या मराठी, हिंदी चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटातील एकही कलाकार माहीत नाही. मला तर अगदी १० मिनिटे नायक कोण आहे हा संभ्रम होता. एक मुळ कन्नड चित्रपट इथे हिंदीत डब करून येतो आणि ते लोकांना का आवडतं असा विचार केला तर भारतीय प्रेक्षक कसा बदलत आहे हे लक्षात येते.

बाहुबली पासून दक्षिण भारतीय चित्रपट हिंदी चित्रपट क्षेत्रात खुप चालत आहे. लालसिंग चढ्ढा सारखा अमीर खानचा चित्रपट सपाटून पडणे आणि असे चित्रपट हिट होणे हे काही संदेश देत आहे. मग तो हिंदीतील तानाजी असो की मराठीतील फर्जंद असो किंवा तेलगुतील पुष्पा असो. भारतीय प्रेक्षक ह्या मातीतील कथा शोधत आहेत. भारतीय संस्कृती, कला, परंपरा, इतिहास, आणि थोर पुरुषांवर आधारित चित्रपट लोकांना हवे आहेत. काल जितके ट्रेलर दाखवले ते तेच दर्शवत आहे. तो चित्रपटात कोण नायक नायिका आहे ते बघून आजकाल बघत नाही. चित्रपटाची किती प्रसिद्धी केली ह्यावरून पण जात नाही. कांताराची तशी काहीच प्रसिद्धी नाही. द काश्मीर फाईल सारखे चित्रपट word of mouth ने प्रसिद्ध होत आहेत.

अगदी चित्रपट संगीताचे पण तेच होत आहे. ह्या जमीनीतील संगीत असेल तरच ते लोकप्रिय होत आहे. बाहुबली, RRR, सैराट सारख्या चित्रपटांचे संगीत भव्य आहे पण भारतीय संगीतावर आहे म्हणून लोकप्रिय आहे. मी स्वतः फ्युजन संगीताचा चाहता आहे. बरेच प्रेक्षक आजही आहे. त्यामुळे धुंदाधुंद चित्रपटाचे पाश्चात्य संगीत पण लोकांना जरुर आवडते. पण भारतीय संगीत लगेच हृदयाला भिडते.

ह्या चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत हे दोन्ही कोस्टल कर्नाटकच्या लोकसंगीतावर आधारित आहे आणि भव्य आहे. असे संगीत पहिल्यांदाच ऐकले. एक मराठी लोकगीत पण चित्रपटात आहे. चित्रपटाचे नेपथ्य, वेषभुषा, चित्रीकरण, action sequences आणि शेवट अगदी बघण्यासारखे आहे.

चित्रपट किती प्रभावीपणे जनजागृती आणि विमर्श प्रस्थापित करु शकतात हे असे चित्रपट दाखवतात. कर्नाटकात हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे सरकारने ६० वर्षे वरील दैव नर्तकांना दोन हजार प्रतिमहा पेंशन घोषित केले. 

एकद जरूर बघावा असा चित्रपट आहे.

सतीश गुंडावार
२२ ऑक्टोबर २०२२


Saturday 15 October 2022

ढापाढापी

विविधभारती हे विलक्षण रेडिओ आहे हे मी नेहमीच म्हणत असतो. आज सकाळी असेच एक सुंदर गाणं लागले होते. 'कोन हैं जो सपनों में आया।' (१९६८)
गाणे सर्वांच्या आवडीचे आहे. शंकर जयकिशन ह्यांच्या हिट गाण्यांपैकी आहे. मी माझ्या पत्नीला सहज म्हणालो की तूला माहीत आहे काय की हे गाणं एका प्रसिद्ध इंग्रजी गाण्यावर तयार केलेले आहे? एल्विस प्रेमलेच्या 'मार्गारिटा' (१९६३)
ह्या हिट गाण्यावरून 'inspiration' घेऊन केलेले आहे.

शंकर जयकिशन सारख्या प्रतिभावान संगीतकारांना अशी copy का करावीशी वाटली? व्यावसायिक अपरिहार्यता की निर्मात्यांची मागणी की वेळेचा अभाव की प्रतिभेची कमी? हे कळायला मार्ग नाही.

जरी ढापलेले गाणे असले अगदी इंग्रजी गाण्याचा भाव पण ढापला आहे तरी हे हिंदी गाणे उत्कृष्ट केले आहे ह्यात शंका नाही.

सतीश गुंडावार
१५ ऑक्टोबर २०२२

Sunday 28 August 2022

भंडारदरा

बऱ्याच वर्षात मी आणि रूपा दोघेच कुठे फिरायला गेलो असे झाले नव्हते. २००९ पासून मुलांचे दहावी, बारावीचे घरी वेध होते तर गेली दोन वर्षे करोनानी घालवली. रूपा परीक्षेसाठी नाशिकला गेली होती. तो योग साधून आम्ही भंडारदराला दोन दिवस जायचे ठरवले. २६ ऑगस्टला भल्या पहाटे निघून नाशिक गाठले आणि रुपाला घेऊन भंडारदऱ्याला पोहचलो.

भंडारदऱ्याला ब्रिटिश कालीन १९११ साली बांधलेले मातीचे धरण आहे. पावसाळ्यात धरणातील अधिकचे पाणी सोडतात. ते नैसर्गिक दगडावर पडून छत्री सारखा आकार होता म्हणून umbrella fall असे म्हणतात. पुढे धरणाचे spillway gate आणि त्यामागे प्रवरा नदीचे अथांग back water. पावसाने जरा सवड काढल्याने पाणी अत्यंत शांत होते. प्रचंड खोल पाण्यात बोटींग करणे हा वेगळाच आनंद. 

२६ ऑगस्टला पोळा होता. आमच्या घरी पोळा हा सर्वात मोठा सण. पोळ्याच्या दिवशी घरी नाही असे पहिल्यादा होत होते. रस्त्यावर पोळ्यावरून परतलेले सजवलेले बैल बघून पोळा साजरा केला. बैला सोबत फोटो काढून शेतकऱ्याला बोजारा दिला.

भंडारदऱ्यात असंख्य धबधबे आहेत. थोडे पुढे गेल्यावर रांधा धबधबा. रांधा धबधबा नदीवर असल्याने वर्षभर असतो. त्या परीसरात दोन धबधबे आहेत. सरकारने सुरक्षेसाठी पुल बांधले आहेत. धबधबा न चुकता बघा. धबधब्यावरून परत येतांना संध्याकाळ झाल्याने हाॅटेलवर येऊन पडलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी पश्चिम दिशेने प्रवासाला सुरुवात केली. गाडी धरणाच्या back water कडे कडेने जाते. डाव्या बाजूला back water आणि उजव्या बाजूला भव्य सह्याद्री. ढगांनी आच्छालेली सह्याद्रीची असंख्य शिखरे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाताच्या छोट्या छोट्या वाड्या. निसर्गाच्या अश्या स्वच्छ सौंदर्याने पुण्यातल्या धकाधकीच्या जीवनातला त्राण लगेच दुर केला!

कोकणकडा करत आम्ही सांदण दरीला आलो.‌ आशियातील नं. दोनची दरी. पावसाळ्यात फक्त दरीच्या मुखापर्यंत जाणे शक्य होते पण हिवाळा आणि उन्हाळ्यात लोक १.५ कि.मी ही लांब दरीत trek करायला येतात.

पुढे १२ व्या शतकातील अमृतेश्वर शीव मंदिर येते. ह्या आदिवासी भागात राज्याने असे सुंदर मंदिर का बांधले असावे हा प्रश्न पडतो. मंदिराच्या बाहेर सासू सुनेचे एक घरगुती भोजनालय आहे. तिथे आम्ही बाजरीची भाकरी, पिठलं, शेव भाजी आणि दफ्तरी तांदळाचा भात असे जेवण केले. दफ्तरी तांदूळ हा स्थानिक भात आहे. अतिशय सुचकर आहे.

पुढे नेकलेस धबधबा, नानी धबधबा येतो. थोडक्यात उरकून टाकला. मध्येच एक अज्ञात धबधबा मिळाला. सहज दिसत नाही. पण आमच्या ड्रायव्हरला पायऱ्या दिसल्या. धबधबाच्या मागे सहज पणे प्रवेश करता येतो. आम्ही त्याचे बाहुबली असे नामकरण केले.

पुढे येणारे वसुंधरा आणि कोलटेंभे ही दोन्ही धबधबे भव्य आहे. न चुकता बघण्यासारखे धबधबे आहेत. वसुंधरा धबधबा सुरक्षित आहे. दोन्ही धबधब्यात मनसोक्त भिजता येते. हे सर्व ठिकाणे संध्याकाळपर्यंत झाली.

ह्या संपूर्ण सहलीत काही विचार वारंवार आले. कॅलिफोर्नियाच्या यसोमिटीली कित्येकदा गेलो. स्वित्झर्लंडला ॲल्प्स बघितला. ती पण सुंदरच आहेत परंतु सह्याद्रीच्या सौंदर्याची भव्यता त्यांच्यापेक्षा फारच मोठी आहे. असे असून सुद्धा आंतरराष्ट्रीय पर्यटक तर एकही दिसला नाही. परप्रांतीय पर्यटक पण नगन्यच. फारच तूरळक वर्दळीचे काय कारण असावे? मी पुण्यात गेले ३० वर्षे रहात असून आम्ही इथे आत्ता का आलो ह्याची पण खंत वाटली. 

भंडारदऱ्याची भौगोलिक माहिती न घेता आल्याने थोडे नियोजन बिघडले. कळसूबाईचे शिखर जवळच आहे हे तिथे गेल्यावर कळले. आज म्हणजे २८ ऑगस्टला कळसूबाईचे शिखर चढण्याचा प्रयत्न केला. पण आणलेले शूज आणि वेळ बघून एक तासाचा trek करून मागे फिरलो आणि पुण्याला परतायला सुरुवात केली.

साधारण एक वाजता ओतूरला पोहचलो. मुख्य रस्त्यावर गाढवे मेस दिसली. शुद्ध शाकाहारी असल्याने बाजूला चौकशी करून जेवायला गेलो. जेवणात मासवडी (ह्या पदार्थाचे असे नाव का ठेवले हे न समजण्यासारखे आहे), शेंगदाण्याची चटणी, शेव, रस्सा आणि पोळी. शेवटी इंद्रायणी तांदळाचा भात आणि साधे वरण असे जेवण मी पहिल्यांदाच जेवलो.

भंडारदरा सर्वार्थाने पुरेपूर पर्यटन स्थळ आहे. Trekking च्या तयारीने आल्यास एक दिवस रतनगड, एक दिवस कळसूबाईचे शिखर trekking करता येईल आणि एक दिवस भंडारदराच्या आजुबाजुचे धबधब्यांचा आनंद घेता येईल. भंडारदऱ्यात MTDC चे रिसाॅर्ट आहे. ते मिळाले तर उत्तमच नाहीतर homestay चांगले आहेत.

सतीश गुंडावार
२८ ऑगस्ट २०२२

Monday 18 July 2022

रूतू जवां

विविध भारती ही विलक्षण गोष्ट आहे की ती नेहमीच सुखद धक्का देत असते. आज सकाळी जेव्हा उठलो त्यावेळी “रुतु जवां” हे गाणं सुरू होतं. मी माझ्या पत्नीला म्हणालो की हे तसे विलक्षण गाणे आहे. हे विशेष गाणे आहे कारण भूपिंदरसिंगचे हिंदी चित्रपटातील हे पहिले गाणे आणि ह्या गाण्यात विलक्षण trumpet वाजवली आहे. ती चिक चॉकलेट ह्या प्रसिद्ध trumpet वादकाने वाजवली आहे. गाणे पडद्यावर भूपिंदरसिंह ने गायले आहे आणि ह्या गाण्यात चिक चॉकलेट पण दिसतो. म्हणून हे विशेष गाणे आहे असे माझ्या पत्नीला म्हणालो.

हे गाणे संपताच अजून एक भूपिंदरसिंगचे गाणे लागले. त्यामुळे मनात त्यांच्या बद्दल विविध विचार मनात यायला लागले. त्यांची अनेक लोकप्रिय गीते मनात फिरू लागली. भूपिंदरसिंग अप्रतिम गायक तर होतेच पण उत्कृष्ठ गिटार वादक होते. राहुल देव बर्मन ह्यांच्या वादक समूहातील एक महत्वाचे गिटार वादक होते. रमेश अय्यर, भूपिंदरसिंग आणि भानु गुप्ता हे acoustic किंवा electric गिटार वाजवायचे तर टोनी वाझ Bass गिटार वाजायचे. ह्या चौकडीची अनेक सुंदर हिंदी गाणी दिली आहेत. मग असाच विचार आला की राहुल देव बर्मनच्या नवरत्नांपैकी आता मोजचेक लोक जीवंत आहे. राहुल देव बर्मनच्या संगीत निर्मितीचे सूत्र आणि राज जाणणारे भूपिंदरसिंग हे एक आहेत. संधी मिळाली तर त्यांना भेटले पाहिजे.

इतक्यात दारावर वर्तमानपत्र आला. पेपर उचलला तर पहिल्याच पानावर दुःखद बातमी की भूपिंदरसिंग आता ह्या दुनियेतून निघून गेले. सकाळचा सुखद धक्का दुःखामध्ये बदलला. माझ्या To Do List मध्ये भूपिंदरसिंगचे नाव वर आहे. त्यांच्यावर एक ब्लॉग नक्की लिहणार. पण आज ते गेल्याने मन सुन्न आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण युगातील एक कलाकार आणि साक्षीदार आज पडद्याआड गेला. माझ्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

https://youtu.be/4JeLUNj80yU

सतीश गुंडावार

१९-जुलै-२०२२

Friday 17 June 2022

जिंदगी ख्वाब है!

दिवसाची सुरवात जर हृदयातील गाण्याने झाली तर ते गाणे दिवसभर ओठांवर असते. आज असेच काही तरी झाले. आज सकाळी हे गाणे विविधभारतीवर लागले.  सलिलदाचे गाणे असल्याने पाश्चात्य संगीताचा वापर आलाच. ह्या गाण्यातील muted trumpet ने माझे लक्ष वेधून घेतले आणि कायमचे हृदयातील गाणे झाले. खरेतर muted trumpet  वादक सरावासाठी वापरतात पण बऱ्याच संगीतकारांनी muted trumpet गाण्यात  खूप  नाविन्यपूर्ण वापरले आहे. गाण्यात Accordion आणि muted trumpet ची melody सुंदर आहे. muted trumpet असल्याने तो ChicChocolate ने वाजवलाअसावा असा माझा कयास आहे. गूगल बाबा त्यावर काही सांगत नाही. पण माझी खात्री आहे की १९५६ चा चित्रपट असल्याने Chic Chocolate नीच वाजवला असावा. पण ह्यावर कोणी खात्रीने सांगू शकत नाही ही खंत आहे. 

सलिलदांनी राजकपूर साठी क्वचितच गाणे केले आहे. त्यामुळे हे गाणे विशेष मानायला पाहिजे. सलिलदा,  शैलेंद्र आणि मुकेश ह्याचे साधे आणि सरळ गाणे असले तरी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून जाते. पडद्यावर राजकपूर आणि मोतीलाल हे त्यावेळचे superstar आहेत.

गाणे साधे असल्याने शौकीन गायकांसाठी मित्रांच्या मैफलीत गाण्यासारखे गाणे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तर हे गाणे अलीकडे पंकज कपूरने Happi ह्या चित्रपटात गायले आहे. जर पंकज कपूर गाऊ शकतो तर आपण तर नक्कीच गाऊ शकतो 😊 😊 पंकज कपूरचे हे गाणे इलायाराजा संगीतबद्ध केले आहे.

दोन्ही गाणी ऎका आणि संगीताचा आनंद घ्या!  

https://youtu.be/GQZaG5SZRYk

https://youtu.be/2ZU684l2sCs 

सतीश गुंडावार

१७-जून-२०२२

Monday 21 March 2022

Break the Bias


I attended one workshop a few years back. The trainer asked every one of us to draw a picture of nature. Over 90% of participants had drawn a picture which had two hills, Sun is rising in between those two hills, a river was flowing from those two hills, a tree, few birds were flying, and few had drawn a hut as well. This is a very simple illustration of how our minds are conditioned because our teachers have taught us a similar picture during our early days in school. Once the minds are conditioned, it is difficult to see or think out of it and we develop our biases accordingly. There are so many biases we carry knowingly and unknowingly every day.



When Russia attacked Ukraine a few days back, this picture (probably fake) was widely circulated in social media globally. The subtle message was that Putin is a new Hitler. What comes to our mind when we hear Hitler? A brutal dictator who is responsible of genocide of Jews during 1941 to 1945 (World War II). Do we really ask a question? Was he really dictator or elected Chancellor of Germany? What comes in our mind when we hear Hitler’s holocaust? Genocide of Jews right! Estimated 6 million Jews were killed in the concentration camps and gas chambers. But we hardly hear how many Roma people were killed in Nazi’s holocaust. Estimated 500,000 Roma people were killed in the concentration camps and gas chambers. This was approximately 50% of the total Roma population in Europe at that time. We show our sympathy towards Jews but not towards Roma people. Who are these Roma people? It is a topic of a separate blog. But these unfortunate people who were/are being rejected by Europeans as they are not originally European. Indians do not know that they are of Indian origin and therefore, Indians do not own or care for them. In short, Hitler killed close to 7 million of his own people during World War II. Therefore, he was a brutal dictator we believe or made us to believe.


Let’s see other examples of brutalities in the world. I will give just 2 examples.

The US army sprayed 45 million liters of Agent Orange across Vietnam during the Vietnam war (1964 to 1975). Agent Orange destroys vegetation on spraying. The US sprayed 28 million liters of Napalm for burning vegetation. These chemicals not only killed Vietnamese but killed a large number of wildlife (tiger, elephant, bears, leopard etc) and extinct many species of animal and vegetation. 50% mangroves were destroyed during this war resulting in typhoons and tsunamis for many years. Rice production reduced/destroyed dramatically during American occupation to create artificial famine. Toxic chemicals (Dioxin) entered into the food chain resulted in a high rate of cancer. Thousands of birth defects such as Spina Bifida, cerebral palsy, physical and intellectual disability, missing or deformed limbs were observed up to the next 4 generations of Vietnamese. The US army conducted massive bombardment on North Vietnam to destroy Ho Chi Minh trails and tunnels. Estimated 16 million ton of ammunition were used in the Vietnam war as compared to 2.1 million in WWII in Europe and Asia by the US army. This is 8 times of WWII in a much smaller area! Today Vietnam still has 30 million bomb craters with 3 meter diameter. They are infertile now. Toxic chemicals and bombardment destroyed 4.5 million acres of forest and agricultural land which is almost 5% of the total land of Vietnam. Total 3 million Vietnamese killed with millions wounded in this war. Do you remember who were the US Presidents during 1964 to 1975? Does anyone call them brutal dictators?

Let’s take another example of our own country.

The British started governing India since 1757 (Battle of Plassey) in a small way but controlled the entire Indian subcontinent from 1818. During British rule from 1757 to 1947, there were numerous famine occurred in India. I am just giving a few major one.

1769 to 1770 – The Great Bengal famine: Estimated 2 million people died due to starvation.

1778 to 1784 – Chalisa Famine: It happened in current UP, Punjab, Rajasthan and Kashmir. Estimated 11 million people died due to starvation.

1791 to 1792 – Doji Bara Famine: It happened in current Andhra, Telangana, Maharashtra, Gujarat and Rajasthan. Estimated 11 million people died due to starvation.

1876 to 1878 – South India Famine: Estimated 5.6 to 9.6 million died due to starvation.

1899 to 1900 – Large Scale Famine: It happened in Maharashtra and Madhya Pradesh. Estimated 1 million people died due to starvation.

1943 – Bengal Famine: 3 million died due to starvation.

One can claim famine is a natural calamity. But, Utsa Patnaik has given the details of these famines, how they were engineered. There is a defined pattern in all these famines.
·         Forceful export of the food grains to England for larger profits. England extracted goods worth trillion dollars during this period.
·         Engineered high inflation deliberately or excess printing of Indian Rupees
·         Reduction of salary of workers and peasants pushed large populations to poverty.
·         Did not allow farmers to cultivate the food grains.
·         No relief work during famine.

Over 40 million Indians died due to starvation from 1769 to 1943. Over 100 million people suffered from malnourishment. The generations of India were less fed over the centuries resulting in an extremely weak Indian population. The effect of these famine and malnourishment can be found on Indians even today. Do you remember who was Prime Minister of the UK in 1943? Do you remember his name? What is his impression in your mind when you see his picture? Do you also know who was his economist friend who advised him to starve Indians?

If you think that Americans and British are more brutal than Germans, then it would be another bias. Brutality of Italian in Libya and Spanish in Latin America will change your perspective of brutality.

We regularly hear in the Indian media that Modi is a Hitler of India. We regularly hear that RSS is a fascist organization or killer of Mahatma Gandhi. No one understands what is fascism but they will call their opponent fascist. These terms are thrown on your face to make you defensive so that common people are not exposed to the truth or to avoid constructive discussion/debate.

The whole topic came into my mind when the “Break the Bias” theme was introduced during the International Women Day celebration this year. Some corporates prominently shown Muslim women in Hijab in the campaign of “Break the Bias”. In fact, they are creating a new narrative/bias to accept Hijab as mainstream culture and not a symbol of women oppression. This is how our minds are conquered, narrative is set, and bias is introduced even under the name of “Break the Bias”!

 
Satish Gundawar
18-Mar-22

Friday 28 January 2022

योगेश

ऱ्याचदा असा विचार येतोकी एखाद्या कलेचा किंवा प्रतिभेचा अविष्कार कशावर अवलंबुन असतो? शिक्षण, जीवनाचा अनुभव की दैवी देणगी की सर्वच? पण जगातकाही असे मंडळी येतात जे जगण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी ज्या कलेची कोणतीही पार्श्वभुमी नसतांना ती कला आत्मसात करतात आणि आपले वेगळे स्थान निर्माण करतात. अशा मंडळींमध्ये योगेश गौर म्हणजेच कवी योगेश ह्यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या जीवनाची कथा एका सिनेमाला लाजवेल अशी आहे. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी घ्यावी लागली. मुंबईत आतेभाऊसिने सृष्टीत नावाजलेले नाव होते त्यांच्या मदतीने काहीतरी काम मिळेल ह्या आशेने ते मुंबईला आले. मुंबईला येतांना त्यांचा मित्र सत्यप्रकाश तिवारी (सत्तू) जो घराचा खुप श्रीमंत होता पण मित्र मुंबईत एकटा काय करेल म्हणुन तो पण योगेश सोबत मुंबईला आला. तेव्हा वय फक्त १६-१७ होते. वडिलांनी आत्या आणि त्यांच्या कुटुंबाचे पुर्ण सांभाळ केला होता. योगेश ह्यांना वाटले की त्या उपकाराची परतफेड आतेभाऊ करेल पण नियतीने काहीतरी वेगळेच त्यांच्यासाठी नेमले होते. योगेश आणि सत्तू त्यांच्या आतेभावाकडे गेलेत पण आतेभावाने ज्याप्रकारे मदत करायचे नाकारले तेव्हा सत्तूने ठरवले की योगेशने सिनेसृष्टीतच नाव केले पाहिजे. तसा त्याचा आग्रह असे. तो योगेशला जगायला कोणतीही नौकरी करू देई ना. योगेशला पण प्रश्न पडायचे की सिनेसृष्टीत काय काम करू शकणार. मुंबईत जगणे कठीण होते. सत्तूने जगण्यासाठी परिश्रम करायचे आणि योगेशने फक्त सिनेमामध्ये काम मिळण्याचे प्रयत्न करायचे.


मित्राची इच्छा आणि नियतीचा खेळ एक दिवस योगेश गीतकार झाले. कमी बजेटचे चित्रपट त्यावेळी पण बनायचे. १९६२ साली “सखी रॉबिन” ह्या चित्रपटासाठी संगीतकार रॉबिन बॅनर्जी ह्यांनी त्यांना संधी दिली. पहिल्याच संधीचे सोनं करत चित्रपटातील सर्व गाणी हीट झालीत. मन्नाडे आणि सुमन कल्याणपूर ह्यांचे "तुम जो आवो तो प्यार आ जाये" (https://youtu.be/sey4T0dtO6oह्या गाण्याने त्यांचे चित्रपट सृष्टी दमदार प्रवेश झाला. 

रॉबिन बॅनर्जी सोबत कमी बजेटची अनेक चित्रपट केलीतकाहीत नाव झालेतर काहीत झाले नाहीकाही ठिकाणी नावाचा उल्लेख पण नाहीदरम्यान गुलझार आणि अंजान सारख्या गीतकारांसोबत खूप काम केलीत्यांच्या कारकिर्दीला घडण्यात मदत केलीचित्रपट सृष्टीतील वर्णभेद सर्वश्रुत आहेकमी बजेटच्या चित्रपट सृष्टीतील कलाकारांनामोठ्या बॅनरची कामे मिळायला परीसस्पर्शाची गरज होतीती वाट पण खडतरत्या वाटेत उषा खन्ना सारख्यानी मोलाची मदत केली (उषा खन्नानी अश्या अनेक उदयोन्मुख मोठे होण्यात मदत केलीअसो!) १९६९ मध्ये "सौ बार बनाकर मालिक ने(https://youtu.be/ltffFkxuCWMहे गाणे योगेशने त्यांच्यासाठी लिहिले.

तब्बल एक दशकाने त्यांच्या कारकिर्दीला मोठे वळण मिळाले ते १९७१ च्या "आनंद" ह्या चित्रपटाने. ह्या चित्रपटातील "कही दूर जब दिन ढल जाये" (https://youtu.be/wjYK67cgNKc) ह्या गाण्यातील “कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जनमों के नाते” ही ओळ त्यांच्या मित्राशिवाय त्यांचे जीवन पुर्ण होत नाही हे आवर्जुन आठवण करून देतात. आणि "जिंदगी कैसी है पहेली हाये" (https://youtu.be/-y6_cFZsMJA) ही दोन गाणी हिंदी चित्रपट गीत रसिकांचे all time favorite आहेत. ह्या चित्रपटाचे शीर्षक गीत योगेशना एक गाणे देण्यासाठी टाकण्यात आले. “आनंद” पासून योगेश आणि सलिलदा ह्यांची जोडी जमली आणि नंतर दोघांनी एकाहून एक उत्तम गाणी दिलीत. "अन्नदाता" मधील "गुजर जाये दिन दिन" (https://youtu.be/zrNLSVvdGOY)"रजनीगंधा" मधील "कई बार यु ही देखा है" (https://youtu.be/CPwbi-hfenI), ह्या गाण्यात पुरुषाच्या स्वछंदी स्वभावाचे नेमके वर्णन "किसको मीत बनाऊँ, किसकी प्रीत भुलाऊँ" ही योगेश ह्यांची शैली. "छोटीसी बात" मधील "न जाने क्यो होता है ये जिंदगी के साथ" (https://youtu.be/7-x-skKZ0-k), ह्या गाण्यात प्रेयसीच्या व्याकुळ मनाचा नेमका ठाव वो अंजान पल ढल गये कल, आज वो रंग बदल बदल, मन को मचल मचल रहें” त्यांनी अगदी सोप्या शब्दात अंकीत केले आहे. "आनंद महल" मधील हे classical based गाणे (https://youtu.be/1q5gYjNXG_I) चिरकाल रसिकांच्या मनात घर करणारे आहे. ही सर्व गाणी संगीत आणि गायकी साठी उच्च पातळीचे आहेत पण लेख गीतकारावर असल्याने त्यावर लिहायचा मोह आवरत आहे.

त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या गाण्यात उर्दूचा परिणाम दिसतो. ते कदाचित गीतकारांना गीत लिहतांना बरेच बंधन असतात त्यामुळे असतील. पण सलिलदा पासून त्यांच्या गाण्यात हिंदीला जास्त प्राधान्य दिलेले दिसते. योगेश ह्यांची लेखन शैली फारच सरळ आणि सोपी होती. दोन किंवा तीन अक्षरांचे शब्द त्यांच्या काव्यात जास्त दिसतील. कोणतेही क्लिष्ट शब्द त्यांनी वापरले नाहीत. सर्व सामान्य माणूस ज्या भावना समजू शकेल असे त्यांचे काव्य असायचे. त्यांच्या बऱ्याच गाण्यात त्यांचा मित्र सत्तूचे त्यांच्या जीवनातील महत्व हे वारंवार दिसून येते. त्यांनी नेहमीच हे सांगितले आहे. म्हणून मी म्हणतो की योगेश ह्यांचे जीवन एखाद्या चित्रपट सारखी आहे.

योगेश स्वतःचा प्रचार करण्यात कदाचित कमी पडले असतीलत्यामुळे त्यांनी मोजक्याच लोकांसोबत काम केले आणि मोजकेच गाणी लिहिली पण ती सर्व मोत्यांसारखी आहेतयोगेशने राजेश रोशन सोबत पण चांगले काम केले आहे"बातों बातों में" मधील "सुनिये कहिये कहिये सुनिये" (https://youtu.be/KkNv_za3G1Qआणि "कोई रोको ना दिवाने को" (https://youtu.be/iwAabtCQcXY)सलिलदांचा परीसस्पर्श झाल्यानंतर एसडीबर्मन आणि आरडीबर्मन ह्यांच्याबरोबर काम केले नाही तर नवलचएसडीबर्मन बरोबर केलेला "मिली" ह्या चित्रपटातील सर्वच गाणी उत्तम आहेत"बडी सुनी सुनी है जिंदगी" (https://youtu.be/Sg49wfzCOukहे मार्मिक गाणे योगेशच नाही तर एसडीआणि किशोरकुमार साठी भावनिक गुंतागुंतीचे आहेरसिकांना हा इतिहास माहीत आहेचपंचम बरोबर त्यांनी केलेली गाणी ही पंचमच्या इतर पाश्चान्त्य आणि भव्य गाण्यापेक्षा पुर्ण वेगळी आहेत"मंजील" ह्या चित्रपटातील "रिमझिम गिरे सावन" (लतादिदी https://youtu.be/46yS0EW2cCQ) (किशोरकुमार https://youtu.be/lfJKW2lmQTQहे गाणे प्रत्येकाला पाऊस पडताना नक्कीच आठवते"शौकिन" मधील "जब भी कोई कंगना बोले" रसिकांच्या आवडीच्या गाण्यात नक्कीच असतातव्यासंगी रसिकांचे आवडते आणि पंचमने केलेल्या ह्या classical गाण्याने लेख संपवत आहेआम्हा मित्रांना पण कोड्यात टाकणारे हे गाणे असे वाटते की खुद्द ओम प्रकाश ह्यांनी गायले असावेपं वसंतराव देशपांडे आणि फैय्याज ह्यांनी गायलेले "ओ मृगनयनी चंद्रमुखी" (https://youtu.be/-eHyzXb94Fkगाण्यात फक्त संवादिनी, तबला आणि सारंगी म्हणजे पंचमच्या प्रकृतीच्या नेमके उलट गाणे. असे आगळेवेगळे योगेश तुम्हाला नक्कीच आवडेल.


सतीश गुंडावार

-जाने-२०२२